शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बेशिस्त वाहनचालकांकडून नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:52 IST

वाहतूककोंडी अथवा वाहनांचा खोळंबा झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न काही दुचाकीचालक आणि बेशिस्त वाहनचालक करतात.

निगडी : पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे निगडी येथील दुर्गानगर चौकात दररोज वाहतूककोंडी होत आहे. सतत होत असलेल्या वाहतूककोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे अर्थात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडीत आणखीनच भर पडते.तळवडे येथील आयटी पार्क, भोसरी, चाकण एमआयडीसीकडून ये-जा करणारी वाहने, निगडी यमुनानगरकडून चालणारी वाहतूक या सर्व वाहतुकीचा दुर्गानगर चौक केंद्रबिंदू असल्याने या चौकातून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागत आहे.दुर्गानगर चौकातून चाकण, तळवडे, भोसरी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाºया कामगारांचीसंख्या मोठ्या प्रमाणात आसते. तसेच या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतूक करणारे कंटेनर, ट्रक कंपन्याच्या बसगाड्या, मोटारी आणि दुचाकी वाहनांची या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. तसेच याच चौकातून मोठी लोकवस्ती असलेल्या यमुनानगर, अजंठानगर या भागातून ये-जा करणाºया विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या चौकात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ये-जा सुरू असते. मात्र विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांसह जीव मुठीत धरून या चौकातून प्रवास करावा लागत आहे.निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाकडून चाकण, भोसरीकडे जाणारी अवजड वाहने या रस्त्याने भरधाव वेगात येतात़ परंतु या चौकात कोणतेही गतिरोधक अस्तित्त्वात नसल्याने वाहनचालकांची अनेकदा धांदल उडते. त्यात रिक्षाचालक रस्ता रिकामा होण्याची वाट न पाहता धोकादायकपणे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा वादावादीचे प्रसंग घडले आहेत.चौका शेजारीच बजाज लिमिटेड कंपनी आसल्याने या चौकातून ये-जा करणाºया कामगार वर्गाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या कंपनी समोरील रस्त्यावर रिक्षाचालक ठाण मांडूनच उभे असतात. रिक्षाचालक वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता रिक्षा कुठेही थांबवतात. यामुळे कोंडीत अधिकची भर पडते. मात्र अशा रिक्षाचालकाला अथवा चार चाकी वाहनांवर वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे अढळून येत आहेत.महापालिका व वाहतूक विभागाने वेळीच लक्ष देऊन येथे उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित होणारी वाहतूककोंडी व अपघात याबाबत विशिष्ट योजना राबवून वाहतूक समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करीत आहेत.चालकांमध्ये होतात वादवाहतूककोंडी अथवा वाहनांचा खोळंबा झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न काही दुचाकीचालक आणि बेशिस्त वाहनचालक करतात. यातून अपघाताचे प्रकार होतात. काही बेशिस्त वाहनचालक अन्य वाहनचालकांना अरेरावी करतात. त्यामुळे येथे सातत्याने वादाचे प्रकार होतात. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष असते.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षवाहतुकीवर नियंत्रण न ठेवता वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाईवर पोलिसांकडून भर देण्यात येतो. त्यामुळे दुर्गानगर चौकातील वाहतूक रामभरोसे असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक बेशिस्त वाहनचालक भरधाव वेगात सिग्नल तोडतात. यामुळे वाहनचालकांची चांगलीच धांदल उडते. यामुळे या चौकात सतत छोटे मोठे अपघात होत असतात. यामुळे या चौकात वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. यामुळे येथून प्रवास करणारे नागरिक व चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.अवजड वाहनांमुळे खोळंबादुर्गानगर चौकातून अवजड वाहनांची वर्दळ असते. एमआयडीसी भागातील अनेक कंपन्यांतील साहित्य वाहतूक करण्यासाठी ट्रक, कंटेनर आदी अवजड वाहने या चौकातून जातात. या वाहनांची लांबी जास्त असल्याने येथे वळण घेताना या वाहनांमुळे सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी येथे वाहतूककोंडी होते.पादचारी मार्गावर पार्किंगरस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग उभारण्यात आले आहेत. परंतु या पादचारी मार्गावर स्थानिक नागरिक किंवा अन्य वाहनचालक वाहने पार्किंग करतात. परिणामी पादचारी मार्ग अडविले जातात. काही व्यावसायिकांकडून या पादचारी मार्गावर हातगाडी आदी लावण्यात येते. त्यामुळे पादचाºयांना पादचारी मार्गाचा वापर करणे शक्य होत नाही. परिणामी पादचाºयांना भर रस्त्यातून ये-जा करावी लागते. यामुळे येथे पादचाºयांना वाहनांची धडक बसून अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यातून पादचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी