शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे कोंडतोय भूमकर चौकाचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:02 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यावसायिकांनी बळकावले पदपथ; कारवाईची मागणी

पिंपरी : डांगे चौक ते हिंजवडी मार्गावरील वाकड येथील भूमकर चौकात वाहतूककोंडी होते. व्यावसायिकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. पदपथावर बेशिस्तपणे पार्किंग केली जाते. परिणामी अपघाताचा धोका असून, पादचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील मुख्य चौकांपैकी एक भूमकर चौक आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहने या चौकातून जातात. या चौक परिसरात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणांमुळे पदपथ गायब झाले आहेत. व्यावसायिकांनी हे पदपथबळकावले आहेत. त्यामुळे पादचाºयांना पदपथांचा वापर करता येत नाही. काही ठिकाणी व्यावसायिकांनी पदपथाची तोडफोड केली आहे.भूमकर चौकातून हिंजवडीला जाणाºया रस्त्यावरील पदपथावर पाणीपुरी विक्रेते, भाजी विक्रे ते, लिंबूपाणी विक्रेते, ताकविक्रेते यांनी पदपथावर ठाण मांडले आहे. काही जणांनी पदपथावर कार्यालये थाटली आहेत. पदपथावरील विक्रेत्यांकडून भाजीपाला आणि अन्य खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यातच वाहन थांबवितात. त्यामुळे येथील कोंडीत भर पडते. काही रिक्षाचालकही भर रस्त्यातच रिक्षा थांबवितात.अतिक्रमणाचा विळखाभूमकर चौक परिसरातील पदपथावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील पदपथाचा वापर पादचाºयांना करता येत नाही. जागोजागी हातगाडीवाले, छोटे व्यावसायिक पदपथांवर ठाण मांडून असतात. अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतरही ही समस्या सुटत नाही. कारवाईनंतर लागलीच ‘जैसे थे’ परिस्थिती होते.- शिवप्रसाद पवार, ज्येष्ठ नागरिकभूमकर चौक परिसरातील व्यावसायिकांनी पदपथाची मोडतोड केलेली आहे. अनेक व्यावसायिकांनी पदपथावर दुकान थाटले आहे. भाजी विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांनी पदपथ बळकावले आहेत. हॉटेलवाल्यांनी पदपथावरच खुर्ची, टेबल ठेवले आहेत. परिणामी पादचाºयांना या पदपथांचा वापर करता येत नाही. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.- यश पिंगळे, तरुणभूमकर चौकातून हिंजवडीला जाणाºया रस्त्याच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. त्या ठिकाणी भाजी विक्रेते, हातगाडीधारक असतात. दुचाकी, चारचाकी गाड्या पदपथावर पार्किंग केल्या जातात. यामुळे पदपथ नेमका कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसभरातून त्या ठिकाणी कधी जरी गेले तरी गाड्या पार्किंग केलेल्या असतात. पदपथाचा वापर करता येत नाही. अपघात होण्याची भीती वाढते. - निकिता माने, तरुणीभूमकर चौकात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्याची कारणे अनेक आहे. बेशिस्तपणे गाडी चालवणे, बेशिस्तपणे गाडी लावणे, रस्त्यावरच गाडी लावणे, त्यानंतर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पदपथच राहिले नाहीत. कधी-कधी असा प्रश्न पडतो, की रस्त्याच्या बाजूचे पदपथ गेले तरी कुठे नेमके? पदपथावर हातगाडीधारक, छोटे व्यावसायिकांनी, भाजी विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. - पवन शिर्के, नागरिक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड