शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कुदळवाडीत बेकायदा दुकाने

By admin | Updated: December 28, 2016 04:33 IST

चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत.

पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आगीला प्रतिबंधक कोणत्याही उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने त्याचा लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. कुदळवाडी हा परिसर महापालिका हद्दीत येत असून, या ठिकाणी भंगार मालासह इतरही दुकाने आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून जितके लक्ष द्यायला हवे, तितके दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. तसेच, या बेकायदेशीर दुकानांना काही राजकीय माननीयांचा आशीर्वाद असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. परिसरातील भंगार मालाची दुकाने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्यापैकी अनेक दुकानांना महापालिकेचा उद्योग व्यवसाय परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे ही दुकाने बेकायदेशीर ठरतात. संबंधित व्यवसायामधून प्रदूषण होत असल्यास त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असते. या परवानगीनंतर उद्योगधंद्यांची परवानगी दिली जाते. अनधिकृत व्यवसायांवर वेगवेगळ्या विभागांकडून एकत्रित कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. अगदी दाटीवाटीने ही दुकाने वसलेली असून, यातील अनेक दुकाने बेकायदेशीर आहेत. येथील दुकानांमध्ये ज्वलनशील पदार्थांचाही वापर केला जातो. यातून आगीच्या दुर्घटना घडतात. मात्र, दुर्घटना घडल्यानंतरच त्याकडे लक्ष जाते. आतापर्यंत कुदळवाडी परिसरात लागलेल्या एकूण आगीच्या घटनांंमध्ये भंगार मालाच्या दुकानांना लागलेल्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. दाटीवाटीने वसलेल्या या परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेही पुरेसे नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलाचे वाहनही ऐनवेळी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. या ठिकाणी लोकवस्ती वाढत असून, जागा अपुरी पडत आहे. केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या भागाकडे लक्ष दिले जाते. मागील महिन्यात चिखली येथे गॅस स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाला जीव गमवावा लागला, तर १९ डिसेंबरला लागलेल्या आगीत सुमारे १० ते १५ भंगार दुकाने खाक झाली. यासह वेळोवेळी लागलेल्या आगीत इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, एखाद्या दुर्घटनेनंतरच संबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधले जाते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)कुदळवाडी परिसरात एक हजार ५९८ दुकाने आहेत. ही दुकाने रहिवासी क्षेत्रात असल्याने परवानगी घेताना पर्यावरणासह सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. - योगेश कडूसकर, सहायक आयुक्त