शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

कुदळवाडीत बेकायदा दुकाने

By admin | Updated: December 28, 2016 04:33 IST

चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत.

पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आगीला प्रतिबंधक कोणत्याही उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने त्याचा लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. कुदळवाडी हा परिसर महापालिका हद्दीत येत असून, या ठिकाणी भंगार मालासह इतरही दुकाने आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून जितके लक्ष द्यायला हवे, तितके दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. तसेच, या बेकायदेशीर दुकानांना काही राजकीय माननीयांचा आशीर्वाद असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. परिसरातील भंगार मालाची दुकाने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्यापैकी अनेक दुकानांना महापालिकेचा उद्योग व्यवसाय परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे ही दुकाने बेकायदेशीर ठरतात. संबंधित व्यवसायामधून प्रदूषण होत असल्यास त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असते. या परवानगीनंतर उद्योगधंद्यांची परवानगी दिली जाते. अनधिकृत व्यवसायांवर वेगवेगळ्या विभागांकडून एकत्रित कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. अगदी दाटीवाटीने ही दुकाने वसलेली असून, यातील अनेक दुकाने बेकायदेशीर आहेत. येथील दुकानांमध्ये ज्वलनशील पदार्थांचाही वापर केला जातो. यातून आगीच्या दुर्घटना घडतात. मात्र, दुर्घटना घडल्यानंतरच त्याकडे लक्ष जाते. आतापर्यंत कुदळवाडी परिसरात लागलेल्या एकूण आगीच्या घटनांंमध्ये भंगार मालाच्या दुकानांना लागलेल्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. दाटीवाटीने वसलेल्या या परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेही पुरेसे नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलाचे वाहनही ऐनवेळी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. या ठिकाणी लोकवस्ती वाढत असून, जागा अपुरी पडत आहे. केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या भागाकडे लक्ष दिले जाते. मागील महिन्यात चिखली येथे गॅस स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाला जीव गमवावा लागला, तर १९ डिसेंबरला लागलेल्या आगीत सुमारे १० ते १५ भंगार दुकाने खाक झाली. यासह वेळोवेळी लागलेल्या आगीत इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, एखाद्या दुर्घटनेनंतरच संबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधले जाते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)कुदळवाडी परिसरात एक हजार ५९८ दुकाने आहेत. ही दुकाने रहिवासी क्षेत्रात असल्याने परवानगी घेताना पर्यावरणासह सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. - योगेश कडूसकर, सहायक आयुक्त