शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या जोखडातून मुक्तझाले उंबरमाळ

By admin | Updated: June 12, 2017 01:10 IST

टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे, ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा धरणग्रस्त असणाऱ्या उंबरमाळ या गावाने यंदा जिद्दीने खंडित केली आहे. उंबरमाळ भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील धरणग्रस्त गाव आहे. भोर तालुक्यापासून २६ किलोमीटर असणारे हे गाव वेळवंडी नदीच्या तीरावर वसलेल्या कांबरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मोडते. सुमारे दीडशेच्या आसपास गावची लोकसंख्या आहे. ब्रिटिशकाळात १९२८ च्या सुमारास वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणामुळे या खोऱ्यातील सुमारे चाळीस गावे बाधित झाली. धरणाच्या पाण्यात येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित बरीचशी शेती गेली. पण घरे मात्र पूर्णपणे वाचली. तत्कालीन कोणतीही नुकसानभरपाई न मिळालेली ही गावे स्वातंत्र्यानंतरही उपेक्षितच राहिली. खराब रस्ते, दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, रोजगाराचा अभाव या समस्यांना या गावांना आजही तोंड द्यावे लागते आहे. धरणाचा लांबवर शेपटासारखा पसरलेला विस्तीर्ण जलाशय हा पावसाळ्यात जरी पर्यटकांना खुणावत असला तरी अनेक गावांसाठी हे उन्हाळ्यातील पाणी मिळण्यासाठीचे एकमेव आशास्थान आहे.धरणातील पाणीसाठ्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर असणाऱ्या गावाला दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असे. जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे तर ती अधिकच तीव्र होत असे. सध्या गावात साधी विहीरही नाही. गावात असणारा छोटा झरा खोदून त्याचा २००४ मध्ये शासनाच्या शिवकालीन पाणीसाठवण योजनेअंतर्गत पाणीसाठा वाढविण्यात आला होता. त्यामुळे ते पाणी संक्रांतीपर्यंत पुरत असे, मग मात्र पाणीटंचाई भासायला सुरुवात होत असे. म्हणून मग शासनाकडे भरपूर पाठपुरावा करून गावात हातपंप बसवून घेतला. परंतु त्याचेही पाणी संक्रांतीच्या आसपास आटत असे. उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने तर थेट नदीतून म्हणजेच पाणीफुगवट्यातून पाणी आणावे लागत असे. उन्हाळ्यात पाणीपातळी जसजशी खोलावत जाते तसतसे हे अंतर अधिक वाढत जाते आणि परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. अशा परिस्थितीत गावातील महिला, मुले व वयोवृद्ध माणसे यांना पाणी आणणे हे दररोजचे जिकीरीचे काम होऊन बसते. उंचावर असणाऱ्या गावातून धरणातून हंडाभर पाणी भरून चढ चढून आणणे, अशी जीवघेणी कसरत महिलांना करावी लागे. टँकरचा प्रस्ताव तर गेली वीस वर्षे ग्रामस्थ शासनाकडे न कंटाळता देतायेत, पण तो प्रत्यक्ष मंजूर होऊन गावात येईपर्यंत मे महिना उजाडत असे. शिवाय टँकर गावात दररोज ठराविक वेळेला येईलच, याची कोणतीही शाश्वती नाही.भोर-वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील पाणीटंचाईसंदर्भात काम करणाऱ्या वेल्ह्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेपर्यंत या गावाची भीषण परिस्थिती स्थानिक कार्यकर्ते बापू जोरकर व सुनील जोरकर यांच्यामार्फत पोहोचली. याआधारे ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे यांनी गावात ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी पोलीसपाटील दत्तात्रय खुळे यांच्या पुढाकाराने केला. त्यास उपसरपंच योगेश खुळे व शिक्षक गणेश खुळे यांची साथ लाभली. त्यापुढील बैठकीत धरणातील पाणीसाठ्यातून गावात नळ-पाणीपुरवठा योजना करण्याचे निश्चित ठरले. बैठकीत ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची लोकवर्गणी या कामासाठी जमा करण्याचे आश्वासन दिले व लगोलग मार्चमध्ये (२०१७) जमाही करून दिले. धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात आवश्यक त्या सरकारी परवानग्या व वीजजोडणीसाठी करावा लागणारा पाठपुरावा याची हमी ग्रामस्थांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यालयात येऊन दिली. यासाठी ग्रामसेवक महादेव सोनवणे यांनीही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य केले. प्रबोधिनीचे तंत्रज्ञ पंकज शिर्के यांनी नळ-पाणी योजनेचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार केले. यासाठी लागणारा निधी मोठा होता. परंतु केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीएसआरप्रमुख तुषार जुवेकर त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य मान्य करून ग्रामस्थांची चिंता दूर केली.खर्चाची जबाबदारी घेतली संस्थांनीया नळपाणी योजनेअंतर्गत ९ हजार लिटर क्षमतेची पाणी साठवणूक टाकी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आली. पाणी साठवणुकीसाठी फेरोसिमेंट टाकीच्या वापराचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग होता. सिमेंटचा मर्यादित वापर करून व लोकसहभागाच्या आधारे या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार मुंबईमधील जलवर्धिनी संस्थेतर्फे केला जातो. प्रबोधिनी कार्यकर्ते प्रदीप जाधव व सुनील जोरकर यांनी याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन उंबरमाळमधील ग्रामस्थांच्या मदतीने ही टाकी बांधली. यात ग्रामस्थांनी जाळीभोवती सिमेंट-वाळूचे मिश्रण लिंपण्याचे काम श्रमदानाने केले. टाकीच्या अंशत: खर्चाची जबाबदारी पुण्यातील सेवावर्धिनी या संस्थेने उचलली.