शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

टँकरच्या जोखडातून मुक्तझाले उंबरमाळ

By admin | Updated: June 12, 2017 01:10 IST

टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे, ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा धरणग्रस्त असणाऱ्या उंबरमाळ या गावाने यंदा जिद्दीने खंडित केली आहे. उंबरमाळ भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील धरणग्रस्त गाव आहे. भोर तालुक्यापासून २६ किलोमीटर असणारे हे गाव वेळवंडी नदीच्या तीरावर वसलेल्या कांबरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मोडते. सुमारे दीडशेच्या आसपास गावची लोकसंख्या आहे. ब्रिटिशकाळात १९२८ च्या सुमारास वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणामुळे या खोऱ्यातील सुमारे चाळीस गावे बाधित झाली. धरणाच्या पाण्यात येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित बरीचशी शेती गेली. पण घरे मात्र पूर्णपणे वाचली. तत्कालीन कोणतीही नुकसानभरपाई न मिळालेली ही गावे स्वातंत्र्यानंतरही उपेक्षितच राहिली. खराब रस्ते, दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, रोजगाराचा अभाव या समस्यांना या गावांना आजही तोंड द्यावे लागते आहे. धरणाचा लांबवर शेपटासारखा पसरलेला विस्तीर्ण जलाशय हा पावसाळ्यात जरी पर्यटकांना खुणावत असला तरी अनेक गावांसाठी हे उन्हाळ्यातील पाणी मिळण्यासाठीचे एकमेव आशास्थान आहे.धरणातील पाणीसाठ्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर असणाऱ्या गावाला दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असे. जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे तर ती अधिकच तीव्र होत असे. सध्या गावात साधी विहीरही नाही. गावात असणारा छोटा झरा खोदून त्याचा २००४ मध्ये शासनाच्या शिवकालीन पाणीसाठवण योजनेअंतर्गत पाणीसाठा वाढविण्यात आला होता. त्यामुळे ते पाणी संक्रांतीपर्यंत पुरत असे, मग मात्र पाणीटंचाई भासायला सुरुवात होत असे. म्हणून मग शासनाकडे भरपूर पाठपुरावा करून गावात हातपंप बसवून घेतला. परंतु त्याचेही पाणी संक्रांतीच्या आसपास आटत असे. उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने तर थेट नदीतून म्हणजेच पाणीफुगवट्यातून पाणी आणावे लागत असे. उन्हाळ्यात पाणीपातळी जसजशी खोलावत जाते तसतसे हे अंतर अधिक वाढत जाते आणि परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. अशा परिस्थितीत गावातील महिला, मुले व वयोवृद्ध माणसे यांना पाणी आणणे हे दररोजचे जिकीरीचे काम होऊन बसते. उंचावर असणाऱ्या गावातून धरणातून हंडाभर पाणी भरून चढ चढून आणणे, अशी जीवघेणी कसरत महिलांना करावी लागे. टँकरचा प्रस्ताव तर गेली वीस वर्षे ग्रामस्थ शासनाकडे न कंटाळता देतायेत, पण तो प्रत्यक्ष मंजूर होऊन गावात येईपर्यंत मे महिना उजाडत असे. शिवाय टँकर गावात दररोज ठराविक वेळेला येईलच, याची कोणतीही शाश्वती नाही.भोर-वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील पाणीटंचाईसंदर्भात काम करणाऱ्या वेल्ह्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेपर्यंत या गावाची भीषण परिस्थिती स्थानिक कार्यकर्ते बापू जोरकर व सुनील जोरकर यांच्यामार्फत पोहोचली. याआधारे ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे यांनी गावात ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी पोलीसपाटील दत्तात्रय खुळे यांच्या पुढाकाराने केला. त्यास उपसरपंच योगेश खुळे व शिक्षक गणेश खुळे यांची साथ लाभली. त्यापुढील बैठकीत धरणातील पाणीसाठ्यातून गावात नळ-पाणीपुरवठा योजना करण्याचे निश्चित ठरले. बैठकीत ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची लोकवर्गणी या कामासाठी जमा करण्याचे आश्वासन दिले व लगोलग मार्चमध्ये (२०१७) जमाही करून दिले. धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात आवश्यक त्या सरकारी परवानग्या व वीजजोडणीसाठी करावा लागणारा पाठपुरावा याची हमी ग्रामस्थांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यालयात येऊन दिली. यासाठी ग्रामसेवक महादेव सोनवणे यांनीही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य केले. प्रबोधिनीचे तंत्रज्ञ पंकज शिर्के यांनी नळ-पाणी योजनेचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार केले. यासाठी लागणारा निधी मोठा होता. परंतु केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीएसआरप्रमुख तुषार जुवेकर त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य मान्य करून ग्रामस्थांची चिंता दूर केली.खर्चाची जबाबदारी घेतली संस्थांनीया नळपाणी योजनेअंतर्गत ९ हजार लिटर क्षमतेची पाणी साठवणूक टाकी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आली. पाणी साठवणुकीसाठी फेरोसिमेंट टाकीच्या वापराचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग होता. सिमेंटचा मर्यादित वापर करून व लोकसहभागाच्या आधारे या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार मुंबईमधील जलवर्धिनी संस्थेतर्फे केला जातो. प्रबोधिनी कार्यकर्ते प्रदीप जाधव व सुनील जोरकर यांनी याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन उंबरमाळमधील ग्रामस्थांच्या मदतीने ही टाकी बांधली. यात ग्रामस्थांनी जाळीभोवती सिमेंट-वाळूचे मिश्रण लिंपण्याचे काम श्रमदानाने केले. टाकीच्या अंशत: खर्चाची जबाबदारी पुण्यातील सेवावर्धिनी या संस्थेने उचलली.