शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

टँकरच्या जोखडातून मुक्तझाले उंबरमाळ

By admin | Updated: June 12, 2017 01:10 IST

टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे, ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा धरणग्रस्त असणाऱ्या उंबरमाळ या गावाने यंदा जिद्दीने खंडित केली आहे. उंबरमाळ भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील धरणग्रस्त गाव आहे. भोर तालुक्यापासून २६ किलोमीटर असणारे हे गाव वेळवंडी नदीच्या तीरावर वसलेल्या कांबरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मोडते. सुमारे दीडशेच्या आसपास गावची लोकसंख्या आहे. ब्रिटिशकाळात १९२८ च्या सुमारास वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणामुळे या खोऱ्यातील सुमारे चाळीस गावे बाधित झाली. धरणाच्या पाण्यात येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित बरीचशी शेती गेली. पण घरे मात्र पूर्णपणे वाचली. तत्कालीन कोणतीही नुकसानभरपाई न मिळालेली ही गावे स्वातंत्र्यानंतरही उपेक्षितच राहिली. खराब रस्ते, दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, रोजगाराचा अभाव या समस्यांना या गावांना आजही तोंड द्यावे लागते आहे. धरणाचा लांबवर शेपटासारखा पसरलेला विस्तीर्ण जलाशय हा पावसाळ्यात जरी पर्यटकांना खुणावत असला तरी अनेक गावांसाठी हे उन्हाळ्यातील पाणी मिळण्यासाठीचे एकमेव आशास्थान आहे.धरणातील पाणीसाठ्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर असणाऱ्या गावाला दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असे. जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे तर ती अधिकच तीव्र होत असे. सध्या गावात साधी विहीरही नाही. गावात असणारा छोटा झरा खोदून त्याचा २००४ मध्ये शासनाच्या शिवकालीन पाणीसाठवण योजनेअंतर्गत पाणीसाठा वाढविण्यात आला होता. त्यामुळे ते पाणी संक्रांतीपर्यंत पुरत असे, मग मात्र पाणीटंचाई भासायला सुरुवात होत असे. म्हणून मग शासनाकडे भरपूर पाठपुरावा करून गावात हातपंप बसवून घेतला. परंतु त्याचेही पाणी संक्रांतीच्या आसपास आटत असे. उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने तर थेट नदीतून म्हणजेच पाणीफुगवट्यातून पाणी आणावे लागत असे. उन्हाळ्यात पाणीपातळी जसजशी खोलावत जाते तसतसे हे अंतर अधिक वाढत जाते आणि परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. अशा परिस्थितीत गावातील महिला, मुले व वयोवृद्ध माणसे यांना पाणी आणणे हे दररोजचे जिकीरीचे काम होऊन बसते. उंचावर असणाऱ्या गावातून धरणातून हंडाभर पाणी भरून चढ चढून आणणे, अशी जीवघेणी कसरत महिलांना करावी लागे. टँकरचा प्रस्ताव तर गेली वीस वर्षे ग्रामस्थ शासनाकडे न कंटाळता देतायेत, पण तो प्रत्यक्ष मंजूर होऊन गावात येईपर्यंत मे महिना उजाडत असे. शिवाय टँकर गावात दररोज ठराविक वेळेला येईलच, याची कोणतीही शाश्वती नाही.भोर-वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील पाणीटंचाईसंदर्भात काम करणाऱ्या वेल्ह्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेपर्यंत या गावाची भीषण परिस्थिती स्थानिक कार्यकर्ते बापू जोरकर व सुनील जोरकर यांच्यामार्फत पोहोचली. याआधारे ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे यांनी गावात ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी पोलीसपाटील दत्तात्रय खुळे यांच्या पुढाकाराने केला. त्यास उपसरपंच योगेश खुळे व शिक्षक गणेश खुळे यांची साथ लाभली. त्यापुढील बैठकीत धरणातील पाणीसाठ्यातून गावात नळ-पाणीपुरवठा योजना करण्याचे निश्चित ठरले. बैठकीत ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची लोकवर्गणी या कामासाठी जमा करण्याचे आश्वासन दिले व लगोलग मार्चमध्ये (२०१७) जमाही करून दिले. धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात आवश्यक त्या सरकारी परवानग्या व वीजजोडणीसाठी करावा लागणारा पाठपुरावा याची हमी ग्रामस्थांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यालयात येऊन दिली. यासाठी ग्रामसेवक महादेव सोनवणे यांनीही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य केले. प्रबोधिनीचे तंत्रज्ञ पंकज शिर्के यांनी नळ-पाणी योजनेचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार केले. यासाठी लागणारा निधी मोठा होता. परंतु केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीएसआरप्रमुख तुषार जुवेकर त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य मान्य करून ग्रामस्थांची चिंता दूर केली.खर्चाची जबाबदारी घेतली संस्थांनीया नळपाणी योजनेअंतर्गत ९ हजार लिटर क्षमतेची पाणी साठवणूक टाकी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आली. पाणी साठवणुकीसाठी फेरोसिमेंट टाकीच्या वापराचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग होता. सिमेंटचा मर्यादित वापर करून व लोकसहभागाच्या आधारे या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार मुंबईमधील जलवर्धिनी संस्थेतर्फे केला जातो. प्रबोधिनी कार्यकर्ते प्रदीप जाधव व सुनील जोरकर यांनी याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन उंबरमाळमधील ग्रामस्थांच्या मदतीने ही टाकी बांधली. यात ग्रामस्थांनी जाळीभोवती सिमेंट-वाळूचे मिश्रण लिंपण्याचे काम श्रमदानाने केले. टाकीच्या अंशत: खर्चाची जबाबदारी पुण्यातील सेवावर्धिनी या संस्थेने उचलली.