शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या जोखडातून मुक्तझाले उंबरमाळ

By admin | Updated: June 12, 2017 01:10 IST

टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे, ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा धरणग्रस्त असणाऱ्या उंबरमाळ या गावाने यंदा जिद्दीने खंडित केली आहे. उंबरमाळ भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील धरणग्रस्त गाव आहे. भोर तालुक्यापासून २६ किलोमीटर असणारे हे गाव वेळवंडी नदीच्या तीरावर वसलेल्या कांबरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मोडते. सुमारे दीडशेच्या आसपास गावची लोकसंख्या आहे. ब्रिटिशकाळात १९२८ च्या सुमारास वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणामुळे या खोऱ्यातील सुमारे चाळीस गावे बाधित झाली. धरणाच्या पाण्यात येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित बरीचशी शेती गेली. पण घरे मात्र पूर्णपणे वाचली. तत्कालीन कोणतीही नुकसानभरपाई न मिळालेली ही गावे स्वातंत्र्यानंतरही उपेक्षितच राहिली. खराब रस्ते, दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, रोजगाराचा अभाव या समस्यांना या गावांना आजही तोंड द्यावे लागते आहे. धरणाचा लांबवर शेपटासारखा पसरलेला विस्तीर्ण जलाशय हा पावसाळ्यात जरी पर्यटकांना खुणावत असला तरी अनेक गावांसाठी हे उन्हाळ्यातील पाणी मिळण्यासाठीचे एकमेव आशास्थान आहे.धरणातील पाणीसाठ्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर असणाऱ्या गावाला दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असे. जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे तर ती अधिकच तीव्र होत असे. सध्या गावात साधी विहीरही नाही. गावात असणारा छोटा झरा खोदून त्याचा २००४ मध्ये शासनाच्या शिवकालीन पाणीसाठवण योजनेअंतर्गत पाणीसाठा वाढविण्यात आला होता. त्यामुळे ते पाणी संक्रांतीपर्यंत पुरत असे, मग मात्र पाणीटंचाई भासायला सुरुवात होत असे. म्हणून मग शासनाकडे भरपूर पाठपुरावा करून गावात हातपंप बसवून घेतला. परंतु त्याचेही पाणी संक्रांतीच्या आसपास आटत असे. उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने तर थेट नदीतून म्हणजेच पाणीफुगवट्यातून पाणी आणावे लागत असे. उन्हाळ्यात पाणीपातळी जसजशी खोलावत जाते तसतसे हे अंतर अधिक वाढत जाते आणि परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. अशा परिस्थितीत गावातील महिला, मुले व वयोवृद्ध माणसे यांना पाणी आणणे हे दररोजचे जिकीरीचे काम होऊन बसते. उंचावर असणाऱ्या गावातून धरणातून हंडाभर पाणी भरून चढ चढून आणणे, अशी जीवघेणी कसरत महिलांना करावी लागे. टँकरचा प्रस्ताव तर गेली वीस वर्षे ग्रामस्थ शासनाकडे न कंटाळता देतायेत, पण तो प्रत्यक्ष मंजूर होऊन गावात येईपर्यंत मे महिना उजाडत असे. शिवाय टँकर गावात दररोज ठराविक वेळेला येईलच, याची कोणतीही शाश्वती नाही.भोर-वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील पाणीटंचाईसंदर्भात काम करणाऱ्या वेल्ह्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेपर्यंत या गावाची भीषण परिस्थिती स्थानिक कार्यकर्ते बापू जोरकर व सुनील जोरकर यांच्यामार्फत पोहोचली. याआधारे ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे यांनी गावात ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी पोलीसपाटील दत्तात्रय खुळे यांच्या पुढाकाराने केला. त्यास उपसरपंच योगेश खुळे व शिक्षक गणेश खुळे यांची साथ लाभली. त्यापुढील बैठकीत धरणातील पाणीसाठ्यातून गावात नळ-पाणीपुरवठा योजना करण्याचे निश्चित ठरले. बैठकीत ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची लोकवर्गणी या कामासाठी जमा करण्याचे आश्वासन दिले व लगोलग मार्चमध्ये (२०१७) जमाही करून दिले. धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात आवश्यक त्या सरकारी परवानग्या व वीजजोडणीसाठी करावा लागणारा पाठपुरावा याची हमी ग्रामस्थांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यालयात येऊन दिली. यासाठी ग्रामसेवक महादेव सोनवणे यांनीही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य केले. प्रबोधिनीचे तंत्रज्ञ पंकज शिर्के यांनी नळ-पाणी योजनेचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार केले. यासाठी लागणारा निधी मोठा होता. परंतु केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीएसआरप्रमुख तुषार जुवेकर त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य मान्य करून ग्रामस्थांची चिंता दूर केली.खर्चाची जबाबदारी घेतली संस्थांनीया नळपाणी योजनेअंतर्गत ९ हजार लिटर क्षमतेची पाणी साठवणूक टाकी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आली. पाणी साठवणुकीसाठी फेरोसिमेंट टाकीच्या वापराचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग होता. सिमेंटचा मर्यादित वापर करून व लोकसहभागाच्या आधारे या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार मुंबईमधील जलवर्धिनी संस्थेतर्फे केला जातो. प्रबोधिनी कार्यकर्ते प्रदीप जाधव व सुनील जोरकर यांनी याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन उंबरमाळमधील ग्रामस्थांच्या मदतीने ही टाकी बांधली. यात ग्रामस्थांनी जाळीभोवती सिमेंट-वाळूचे मिश्रण लिंपण्याचे काम श्रमदानाने केले. टाकीच्या अंशत: खर्चाची जबाबदारी पुण्यातील सेवावर्धिनी या संस्थेने उचलली.