शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खिळेमुक्तीसाठी सरसावले वृक्षप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:37 IST

जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे.

रावेत : जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे.त्यासाठी खिळेमुक्त झाडे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवारी (दि. ८) ७० झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. दोन किलो खिळे काढून झाडांना वेदनामुक्त करण्यात आले.शहरात खिळेमुक्त झाडे, ‘नेल फ्री ट्री, पेन फ्री ट्री’ या अभियानांतर्गत ‘मी पाणी अंघोळीची गोळी’ यांच्या वतीने निगडी प्राधिकरणातील भेळ चौक ते काचघर चौक मार्गावर असणाऱ्या झाडांचे जवळपास दोन किलो खिळे काढले. प्रत्येक मंगळवारी चालणाºया या अभियानाची प्रेरणा घेऊन कै़ तुकाराम प्रतिष्ठानने हाच उपक्रम रविवारीसुद्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘अंघोळीची गोळी’मार्फत हा उपक्रम राबवला जात आहे. संभाजीनगर येथील ३८ झाडांना खिळेमुक्त केले आणि झाडांच्या संवर्धनाची आणि संवेदनांची गुढी उभारली. झाडांचे आयुष्य वाढविण्याच्या उद्देशाने झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी ‘खिळेमुक्त झाडे’ असे या उपक्रमाचे नाव असून याद्वारे शहरातील झाडे खिळेमुक्त केली जाणार आहेत. झाडांना वेदनामुक्त करण्याचा छोटा पण एक प्रामाणिक प्रयत्न आंघोळीची गोळी ह्यूमन सोसायटी, तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र संघटना, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, यांचे ४० सभासद सहभागी झाले. त्यात दोन तास हा उपक्रम करण्यात आला. त्यात ३२ झाडे खिळेमुक्त करण्यात आले.महादेव पाटील, अनिल पालकर, अशोक तनपुरे, संदीप सकपाळ, लक्ष्मण शिंदे, नितीन मोरे, नकुल टळले, फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, अरुण पाटील, बंटी सकपाळ, स्वाती पालकर, उल्हास टाकले, सूर्यकांत मूथीयान, समाधान पाटील, विठ्ठल सहाणेयांनी सहभाग घेतला़ येथून पुढे शहरातील विविध ठिकाणी तुकाराम तनपुरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत खिळेमुक्त झाडे अभियान यांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे अशोक तनपुरे यांनी सांगितले.>महापालिका : उद्यान विभाग उदासीनशहरातील वृक्षांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र महापालिकेचा उद्यान विभाग याबाबत उदासीन आहे. उद्यान विभागाचे अधीक्षक आणि अन्य अधिकारी यांचा वृक्ष संवर्धनात सक्रिय सहभाग दिसून येत नाही. केवळ कागदी घोडे नाचवून शहरात वृक्षारोपण केल्याचे सांगण्यात येते. दर वर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र त्यांच्या संवर्धनाचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत असतो. झाडांवर खिळे ठोकून जाहिरातबाजी केली जात असतानाही उद्यान विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.सामान्यांच्या सहभागाची गरजवृक्षसंवर्धनाची जबाबदारी केवळ महापालिका प्रशासनाची नसून शहरवासीयांचीही आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील झाडांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे निगा राखणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनी स्वत: पुढाकार घेत झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन वृक्षपे्रमींकडून करण्यात येत आहे.कारवाईची मागणीशहरातील झाडांवर जाहिरात फलक लावण्यात येतात. त्यासाठी झाडांना खिळे ठोकून त्यांना वेदना पोहोचविण्यात येतात. या प्रकारामुळे शहराचे विद्रूपीकरणही होत आहे. त्यामुळे अशा जाहिराती करणाºया दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृक्षपे्रमींकडून होत आहे.