शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘ट्रान्सपोर्ट’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:59 IST

उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना

अनिल पवळ पिंपरी : उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे. गत एका महिन्यात सुमारे दीड हजार कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. या शहरात हजारो कंपन्यांमधून विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली जातात. ही उत्पादने विविध शहरांत, राज्याबाहेर पाठवायची असल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवसायातून सुमारे १० हजार कोटींची उलाढाल होत असते.एक जुलैपासून देशभरात वस्तू व सेवाकर लागू करण्यात आला. त्यात प्रथमच कापडावर जीएसटी लावण्यात आला. याशिवाय लोखंड, ब्रॅण्डेड धान्यासह इतरही वस्तूंवर कराच्या टक्केवारीत वाढ केली. त्यामुळे बहुतांश व्यापाºयांनी कोणताही नवीन माल खरेदी करण्याची घाई केली नाही. व्यापाºयांमध्ये अद्यापही या कराबद्दल संभ्रमाची स्थिती असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावली आहे. त्यामुळे बाजारात मालाची टंचाई जाणवू लागली असून, त्याचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना बसला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यांमध्ये मोठा व्यवसाय होतो. मात्र, व्यापारीच माल खरेदी करीत नसल्याने ट्रक व्यवसाय थंडावला आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत दीड हजार कोटींच्या व्यवसायाला ब्रेक लागला आहे. परिणामी, ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कामगार, चालक आणि वाहकांचे हात रिकामे आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसाय ७० टक्के प्रभावित झाल्याने शहरातील निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरी, भोसरी, संतनगर भागात ट्रकच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.शहरातील अनेक छोट्या कंपन्यांनी जीएसटीमुळे गेल्या काही महिन्यांपासूनच उत्पादनात घट केली होती. जुन्या मालाची विक्री करून नवा माल नव्या दराने विक्रीसाठी सर्व प्रतीक्षेत आहेत. डिस्ट्रिब्युटर बाजारात माल पाठवीत असला, तरी छोट्या व्यापाºयांनी अद्याप जीएसटीचा नंबर घेतलेला नाही. त्यांनी नवा माल खरेदी करणेच बंद केले आहे. कंपन्यांमधून निघालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास २० दिवस लागतात. विस्कळीत झालेली साखळी पूर्वस्थितीत येण्यासाठी किमान महिना लागेल, असे व्यावसायिक म्हणतात.शहरात लहान व्यावसायिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या व्यवसायामुळे तीनचाकी, चारचाकी छोट्या मालवाहतूक करणाºया वाहनांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे काम उपलब्ध होते. मात्र, जीएसटीसाठी आवश्यक असणारी नोंदणी अद्याप छोट्या व्यावसायिकांनी केली नाही. त्यामुळे त्यांनाही वाहतुकीची कामे नाहीत. वाहनतळावर धंद्याअभावी वाहने उभी आहेत. रोजच्या व्यवसायावर रोजीरोटी चालते. एकाएकी कामच मंदावले आहे. त्यामुळे घर खर्च आणि गाडीचे हप्ते फेडायचे कसे, ही विवंचना वाहनचालकांना सतावत आहे.