शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:58 IST

चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले.

पिंपरी पेंढार : चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले. मात्र, बाजारभाव व मालाला उठाव नसल्याने पीक शेतातच फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे टोमॅटो आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आशिया खंडातील नावाजलेली नारायणगाव येथिल टोमॅटोची बाजारपेठ. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात सुमारे १० ते १२ हजार एकरांवर टोमॅटोचीलागवड होत असते आणि परंतु मागील १० वर्षाच्या लागवडीच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के लागवडी कमी आहेत. या परिसरात साधारणपणे फेब्रुवारीपासून टोमाटो लागवडीचा हंगाम सुरू होतो ते थेट पावसाळ्यापर्यंत. परंतु उन्हाळी हंगामाच्या लागवडी एप्रिलच्या तिसºया आठवड्यापर्यंत समाप्त होतात.खरा हंगाम सुरू होतो तो जूननंतर. मात्र काही शेतकºयांनी आघात लागवड करीत टोमॅटो पीक घेतले. मात्र बाजार भाव उठाव नसल्याने पीक फेकून देण्याची वेळ आली आहे.या पिकासाठी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग पसरविणे, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, काठी, डांब, तार, हा सर्व खर्च एकरी कमीतकमी दीड लाख रुपयांपर्यंत होतो. टोमॅटो पीक कमी दिवसांत जास्त नफा देऊन जाणारे असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. अतिशय मेहनत करून शेतकºयांनी चांगले पीक तयार केले परंतु बाजारभाव दीर्घकाळ मंदीत आल्याने शेतकºयाच्या हातात एकहीरुपया पडत नाही. अशा या मंदीच्या लाटेमध्ये सापडलेल्या शेतकºयाने उभ्या पिकात नांगर घातला आहे. जनावरे सोडली आहेत.सतरा लाखरुपयांचा तोटाजुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सावळेराम नानाभाऊ कुटे यांनी टोमॅटोच्या अकरा एकर बागा काढून टाकल्या आहेत.टोमॅटोस प्रतिएकर दीड लाख रुपये खर्च याप्रमाणे सुमारे सतरा लाख रुपयांचा तोटा त्यांना या वेळी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.सद्यस्थितीत नारायणगावयेथील बाजारात आज ७० ते८० रुपये प्रति २० किलोला बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १५००० ते १८००० क्रेट्स (२० किलो / क्रेट्स) टोमॅटो मार्केटमध्ये आवक झाली आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापारी अमित दांगट यांनी दिली.हरियाना, पंजाब, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या भागातून संपूर्ण देशात टोमॅटो पुरवठा होत असल्यामुळे आपल्या भागातील टोमाटोला मागणी नाही. यामुळे येथीळ व्यापाºयांना स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. येणाºया २० ते २५ दिवसांत परराज्यातील टोमॅटो उत्पादनात घट होण्याची स्थिती असल्यामुळे टोमाटोचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे आहेत.