शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:58 IST

चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले.

पिंपरी पेंढार : चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले. मात्र, बाजारभाव व मालाला उठाव नसल्याने पीक शेतातच फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे टोमॅटो आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आशिया खंडातील नावाजलेली नारायणगाव येथिल टोमॅटोची बाजारपेठ. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात सुमारे १० ते १२ हजार एकरांवर टोमॅटोचीलागवड होत असते आणि परंतु मागील १० वर्षाच्या लागवडीच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के लागवडी कमी आहेत. या परिसरात साधारणपणे फेब्रुवारीपासून टोमाटो लागवडीचा हंगाम सुरू होतो ते थेट पावसाळ्यापर्यंत. परंतु उन्हाळी हंगामाच्या लागवडी एप्रिलच्या तिसºया आठवड्यापर्यंत समाप्त होतात.खरा हंगाम सुरू होतो तो जूननंतर. मात्र काही शेतकºयांनी आघात लागवड करीत टोमॅटो पीक घेतले. मात्र बाजार भाव उठाव नसल्याने पीक फेकून देण्याची वेळ आली आहे.या पिकासाठी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग पसरविणे, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, काठी, डांब, तार, हा सर्व खर्च एकरी कमीतकमी दीड लाख रुपयांपर्यंत होतो. टोमॅटो पीक कमी दिवसांत जास्त नफा देऊन जाणारे असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. अतिशय मेहनत करून शेतकºयांनी चांगले पीक तयार केले परंतु बाजारभाव दीर्घकाळ मंदीत आल्याने शेतकºयाच्या हातात एकहीरुपया पडत नाही. अशा या मंदीच्या लाटेमध्ये सापडलेल्या शेतकºयाने उभ्या पिकात नांगर घातला आहे. जनावरे सोडली आहेत.सतरा लाखरुपयांचा तोटाजुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सावळेराम नानाभाऊ कुटे यांनी टोमॅटोच्या अकरा एकर बागा काढून टाकल्या आहेत.टोमॅटोस प्रतिएकर दीड लाख रुपये खर्च याप्रमाणे सुमारे सतरा लाख रुपयांचा तोटा त्यांना या वेळी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.सद्यस्थितीत नारायणगावयेथील बाजारात आज ७० ते८० रुपये प्रति २० किलोला बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १५००० ते १८००० क्रेट्स (२० किलो / क्रेट्स) टोमॅटो मार्केटमध्ये आवक झाली आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापारी अमित दांगट यांनी दिली.हरियाना, पंजाब, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या भागातून संपूर्ण देशात टोमॅटो पुरवठा होत असल्यामुळे आपल्या भागातील टोमाटोला मागणी नाही. यामुळे येथीळ व्यापाºयांना स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. येणाºया २० ते २५ दिवसांत परराज्यातील टोमॅटो उत्पादनात घट होण्याची स्थिती असल्यामुळे टोमाटोचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे आहेत.