शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:58 IST

चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले.

पिंपरी पेंढार : चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले. मात्र, बाजारभाव व मालाला उठाव नसल्याने पीक शेतातच फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे टोमॅटो आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आशिया खंडातील नावाजलेली नारायणगाव येथिल टोमॅटोची बाजारपेठ. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात सुमारे १० ते १२ हजार एकरांवर टोमॅटोचीलागवड होत असते आणि परंतु मागील १० वर्षाच्या लागवडीच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के लागवडी कमी आहेत. या परिसरात साधारणपणे फेब्रुवारीपासून टोमाटो लागवडीचा हंगाम सुरू होतो ते थेट पावसाळ्यापर्यंत. परंतु उन्हाळी हंगामाच्या लागवडी एप्रिलच्या तिसºया आठवड्यापर्यंत समाप्त होतात.खरा हंगाम सुरू होतो तो जूननंतर. मात्र काही शेतकºयांनी आघात लागवड करीत टोमॅटो पीक घेतले. मात्र बाजार भाव उठाव नसल्याने पीक फेकून देण्याची वेळ आली आहे.या पिकासाठी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग पसरविणे, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, काठी, डांब, तार, हा सर्व खर्च एकरी कमीतकमी दीड लाख रुपयांपर्यंत होतो. टोमॅटो पीक कमी दिवसांत जास्त नफा देऊन जाणारे असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. अतिशय मेहनत करून शेतकºयांनी चांगले पीक तयार केले परंतु बाजारभाव दीर्घकाळ मंदीत आल्याने शेतकºयाच्या हातात एकहीरुपया पडत नाही. अशा या मंदीच्या लाटेमध्ये सापडलेल्या शेतकºयाने उभ्या पिकात नांगर घातला आहे. जनावरे सोडली आहेत.सतरा लाखरुपयांचा तोटाजुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सावळेराम नानाभाऊ कुटे यांनी टोमॅटोच्या अकरा एकर बागा काढून टाकल्या आहेत.टोमॅटोस प्रतिएकर दीड लाख रुपये खर्च याप्रमाणे सुमारे सतरा लाख रुपयांचा तोटा त्यांना या वेळी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.सद्यस्थितीत नारायणगावयेथील बाजारात आज ७० ते८० रुपये प्रति २० किलोला बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १५००० ते १८००० क्रेट्स (२० किलो / क्रेट्स) टोमॅटो मार्केटमध्ये आवक झाली आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापारी अमित दांगट यांनी दिली.हरियाना, पंजाब, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या भागातून संपूर्ण देशात टोमॅटो पुरवठा होत असल्यामुळे आपल्या भागातील टोमाटोला मागणी नाही. यामुळे येथीळ व्यापाºयांना स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. येणाºया २० ते २५ दिवसांत परराज्यातील टोमॅटो उत्पादनात घट होण्याची स्थिती असल्यामुळे टोमाटोचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे आहेत.