शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

पाण्यासाठी दिघीकरांचा टाहो...

By admin | Updated: May 5, 2017 02:40 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यातून शहरवासीयांची पावसाळ्यापर्यंत तहान भागविली जावी, यासाठी

दिघी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यातून शहरवासीयांची पावसाळ्यापर्यंत तहान भागविली जावी, यासाठी महापालिकेने पाणीकपातीचे धोरण अवलंबून दिवसाआड पाणीपुरवठा सुरूकेला आहे. मात्र, पाणीपुरवठा करण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तसेच काही भागात होत असलेला दुर्र्गंधीयुक्त व घाण पाण्याच्या पुरवठ्याने पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी दिघीकरांची धावपळ उडाली असून, तहान भागविण्यासाठी नागरिक टाहो फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील शिवनगरी कॉलनी क्रमांक १,२,३ मध्ये संध्याकाळी पाणी सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी कपातीमुळे पाणी येणार नाही म्हणून नागरिकांनी घरातील छोटी भांडी साठवणीसाठी काढली. मात्र पाण्याची करंगळीपेक्षाही कमी येणारी धार पाहूनच स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले. तासाभरात भरणाऱ्या टाक्या दोन तास पाणीपुरवठा होऊनसुद्धा कोरड्याच राहिल्या. त्यामुळे दोन दिवस काढायचे तरी कसे या जलसंकटात दिघीकर सापडले आहेत. समान दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. विजयनगर कॉलनी क्रमांक ६ मध्ये तर भीषण परिस्थिती आहे. तीन महिन्यांपासून रहिवाशांना दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याच्या पुरवठा होत आहे. पाण्याला उग्र वास येत असून, या पाण्यामुळे आंघोळ केल्यानंतर खाज सुटणे, पोटदुखी, लहान मुलांना ताप-उलट्यांचा त्रास होत असून, कित्येकांना दवाखान्याची पायरी चढून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. नळामधून येणारे काळेशार, दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांनी बाटलीत साठवून प्रभागातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवले. तरीसुद्धा ढिम्म प्रशासनाने कुचकामी कारवाईचा बाऊ करीत समस्या जैसे थे आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीसुद्धा असभ्य वागणूक देत, नळजोड कापून टाकायच्या धमक्या देत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. परिसरातील पाण्याचे व्हॉल्व्ह उघडण्याचे अवजारे बनवून काही घातकी मंडळी पाणी पळवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गजाननमहाराजनगरातसुद्धा परिस्थिती वेगळी नाही. येथेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पूर्वी महापालिकेने परिसरात दिलेल्या कूपनलिका सध्या बंद आहेत. हातपंप सुरू असते, तर निदान घरात लागणाऱ्या इतर कामासाठी पाण्याचा वापर केला गेला असता. पिण्यासाठी सुद्धा पाणी योग्य असल्याने तहानही भागली असती. मात्र सद्य:स्थितीत पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने घशाला कोरड पडली असल्याचे स्थानिक सांगतात.प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी याबद्दल अवाक्षर काढत नसून पाणी समस्येबद्दल मोबाइलवरून केलेल्या मेसेजला उत्तर दिले जात नाही.(वार्ताहर)एका दिवसाआड पाण्याने उडविली झोपजाधववाडी : पाणी नसेल तर काय होईल, याची कल्पनाच करवत नाही याचाच प्रत्यय जाधववाडीत पाहायला मिळाला. एरवी पाण्याबाबत बिनधास्त असणाऱ्या जाधववाडीकरांची एका दिवसाआड पाणीपुरवठ्याने चांगलीच झोप उडाली आहे. जाधववाडीत काही ठिकाणी पहाटे पाच वाजता पाणी येत असल्याने अनेक नागरिक लवकर उठून पाणीसाठा करत आहेत. आपल्या घरातील अधिकाधिक भांडी भरून ठेवण्यास पसंती देत आहेत. यासह शेजारीच असलेल्या कुदळवाडीतून पाणी साठविण्याकरिता बॅरल्स आणण्यात येत आहेत. काही ठिकाणी दुपारी पाणी येत असून त्याठिकाणी पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता धडपडत असताना पाहायला मिळाले. परिसरातील छोट्या मोठ्या व्यासायिकांचीही पाणी साठविण्याकरिता एक दिवस आधीच लगबग पाहायला मिळाली.पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीदिघी : साई पार्क गावठाणातील मंदिराशेजारील काही कुटुंबे, या सर्वांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने हा पाण्याबाबत दुजाभाव होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आदर्शनगरमधील ज्ञानदीप बालगृहातील मुलांना या पाणीकपातीचा सर्वांत मोठा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळाले नाही. बालगृहात असणारे ५५ अनाथ मुले, कर्मचारी यांना दिवसाला नऊ हजार लिटर पाणी लागते. दर दिवशी पाण्याचा टॅँकर परवडत नसल्याने मुले आंघोळीविनाच राहून पिण्यासाठी दोन दिवस पाणी वापरत असल्याचे बालगृहाच्या अधीक्षकांनी सांगितले.