शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

बँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या कारखान्यांची गळचेपी

By admin | Updated: September 7, 2015 04:19 IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मदन देवकाते यांना न घेतल्यास कारखान्याला बॅँकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही

बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मदन देवकाते यांना न घेतल्यास कारखान्याला बॅँकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही, असा दमच आमदार अजित पवार यांनी दिला. जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या ताब्यातील कारखान्यांची गळचेपीच केली जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बारामती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी या प्रकारचे वक्तव्य केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या; पण जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून माळेगाव कारखान्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी मेळाव्यानंतर खासगीत दिली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली. या कारखान्यावर चंद्रराव तावरे गटाचे वर्चस्व आहे. माळेगाव कारखाना सध्या सुस्थितीमध्ये आहे. हंगाम सुरू करण्याच्या दिशेने कारखान्याचे नियोजन सध्या सुरू आहे. असे असताना सत्ता गेली तरी जुनेच राजकारण अजित पवार करताना दिसत आहेत. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मदन देवकाते यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना जिल्हा बॅँकेचे संचालक म्हणून निवडून आणले. आता बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून देवकाते यांचीच माळेगाव कारखान्यावर नियुक्ती करावी, असा आग्रह अजित पवार यांचा आहे. वास्तविक ७६व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा बँकेच्या प्रतिनिधीची कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड करणे नियमबाह्य आहे. तरीदेखील केवळ विरोधकांचा कारखाना म्हणून अजित पवार राजकारण करीत आहेत काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सहकारी बॅँक, जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून विरोधकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न यापूर्वीदेखील झालेला आहे. माळेगाव कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. जिल्हा बॅँकेचे नियमित कर्ज फेडणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले जाते. (वार्ताहर)