शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शिवरायांचे विचार आचरणात आणावेत : घोणे

By admin | Updated: February 20, 2017 02:22 IST

छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांची जयंती घराघरांत साजरी व्हावी तसेच जिजाऊंचे संस्कार, संत तुकोबारायांचे

जेजुरी : छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांची जयंती घराघरांत साजरी व्हावी तसेच जिजाऊंचे संस्कार, संत तुकोबारायांचे आचरण व शिवरायांचे विचार घराघरांत व मनामनांत रुजविण्याची गरज या युगात आहे, असे मत श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी व्यक्त केले.जुनी जेजुरी येथील बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक जयदीप बारभाई, गणेश शिंदे, अरुण बारभाई, नगरसेविका अमिना पानसरे, सविता जगताप, हेमंत सोनवणे, एन. डी. जगताप, पांडुरंग सोनवणे, राजेश पाटील, हरीश चामे, सर्जेराव कदम, अजयसिंह सावंत, दशरथतात्या जगताप उपस्थित्ज्ञोते. संत सोपानकाका वारकरी भागवत संप्रदाय जेजुरी-मोरगाव व परिसर तसेच स्थानिक महिलांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त पाळणा सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वारकरी संप्रदाय क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जयवंत जगताप यांना वारकरी गौरव पुरस्कार, सहकार-शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री बल्लाळेश्वर दूध संस्थेचे चेअरमन तानाजी जगताप यांना सहकाररत्न पुरस्कार, जिजाऊ ज्ञानमंदिराच्या शिक्षिका कोमल चौगुले यांना शिक्षकरत्न पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील सिद्धार्थ शिंदे यांना क्रीडारत्न पुरस्काराने गौरविले.नगराध्यक्षा वीणा सोनावणे, नगरसेवक जयदीप बारभाई यांनी या वेळी मार्गदर्शन केले. शिवाजीमहाराज जयंती साजरी झाल्यानंतर जिजाऊ ज्ञान मंदिरातील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली.सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप यांनी प्रास्ताविक, तानाजी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एन. डी. जगताप, मोहन भोसले, दत्ता शिंदे, छगन कामथे, करण जगताप, मोहन चौधरी, धनंजय देशमुख, दत्ता कोळेकर, बाळासाहेब कदम, शिवाजी जगताप, निखिल शिवरकर, आकाश जगताप, वासिम मणेर, ज्ञानोबा जाधव आदींनी नियोजन केले.