शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्ड्यांना तात्पुरती मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:44 IST

वाल्हेकरवाडीमधील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यामुळे आता पावसामुळे पडलेले खड्डे मुरूम टाकून तात्पुरते बुजवण्यात येत आहेत.

रावेत : वाल्हेकरवाडीमधील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यामुळे आता पावसामुळे पडलेले खड्डे मुरूम टाकून तात्पुरते बुजवण्यात येत आहेत.मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्याामुळे नागरिकांना दिलासाही मिळाला. पण यामुळे दुसरीकडे मात्र रस्त्यांवर खड्ड्यांचा विषय पुन्हा डोके वर काढत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनाही जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे. शहराच्या अंतर्गत भागांमध्ये रस्त्यांच्या समस्या नागरिकांना नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे.या रस्त्याची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. रस्त्याची चाळण झाल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. रावेत, रावेतगाव, शिंदे वस्ती, जाधव वस्ती, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, गावठाण परिसर आदी भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.पावसाची रिमझिम चालू असतानाच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. परंतु परत पाऊस आला की हेच खड्डे पूर्ववत स्थितीत येतात़ पाऊस पडण्याआधी रस्त्याची डागडुजी करणे महत्त्वाचे असूनही खड्डे पडल्यानंतर महापालिकेला ते मुरूम टाकून बुजवण्याची जाग येते. यावरूनच रस्त्यांच्या प्रश्नांबाबत महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे, असेच म्हणावे लागेल. रस्त्यांचे डांबरीकरण वेळेत होणे अपेक्षित होते. परंतु खड्ड्यांमुळे रस्त्याचेच विद्रूपीकरण होत आहे. डागडुजीसाठी एवढा निधी मंजूर होऊन काम काहीच दिसत नसल्याने निधी नेमका कुणाच्या खिशात गेला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहने अडकून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे मुरूम टाकून या खड्ड्याचे काम न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे़