शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू बळावला

By admin | Updated: August 14, 2015 03:12 IST

पावसाळी वातावरणामुळे साथीचे आजार बळाण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लूचा विळखा शहरास बसू लागला आहे.

पिंपरी : पावसाळी वातावरणामुळे साथीचे आजार बळाण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लूचा विळखा शहरास बसू लागला आहे. साथीचे आजार वाढत असताना महापालिका यंत्रणा अजूनही ढिम्म असल्याचे दिसून येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर स्वाइन फ्लूचा पहिला बळी जुन्नरची महिला ठरली आहे. पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढायला सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी याच वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी महिन्यापासूनच स्वाइन फ्लूचे रुग्ण अधिक आढळून आले. गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने ३३ जणांचा बळी घेतला आहे. दिनांक १ जानेवारी २०१५पासून आजपर्यंत ६ लाख ७१ हजार ८५६ रुग्णांची प्राथमिक तपासणी झाली आहे. यापैकी ८१ हजार ७१६ जणांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असल्याचे आढळले. यातील एकूण २० हजार ७०१ जणांना टॅमी फ्लू देण्यात आल्या. यामधून ६९० रुग्णांचे लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. स्वाइन फ्लूची लागण झालेले ३७२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या वतीने स्वाइन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज आहे. मात्र, प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतेय२००९मध्ये स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्या वर्षात स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूची संख्या २१ इतकी होती. या तापामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या सन २०१०मध्ये होती. ५६ जणांचा बळी घेतला होता. पोहोचला होता. तर, २०११मध्ये फक्त एकच मृत्यू झाला होता.नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, डोके दुखत असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. औषधाच्या दुकानात जाऊन परस्पर औषधे घेऊ नयेत. अधिक माहितीसाठी किंवा उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात संपर्क साधावा, गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घेणे, मधुमेह, रक्तदाब असे इतर आजार असणाऱ्यांनीही काळजी घेणे, आवश्यकता असल्यास टॅमी फ्लूच्या गोळ्या घ्याव्यात, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)