शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: July 17, 2017 04:12 IST

मंगळवारी वाघोली येथे भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये ग्राहकांच्या खिशातील मोबाईल शिताफीने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : मंगळवारी वाघोली येथे भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये ग्राहकांच्या खिशातील मोबाईल शिताफीने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. प्रत्येक बाजारामध्ये दोन-तीन मोबाईल हमखास चोरीला जाण्याचे सध्याचे प्रमाण असून, यामागे सात ते आठ चोरट्यांचे टोळके कार्यरत असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगितले जाते. चोरीच्या घटना वाढत असल्या, तरी पोलीस प्रशासन चोरट्यांना आळा घालण्यात अपयशी ठरत आहेत.वाघोलीच्या बाजारतळ मैदानामध्ये प्रत्येक मंगळवारी आठवडे बाजार भरतो. वाघोलीसह परिसरातील दहा गावांतील शेतकरी बाजारामध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात, त्याचप्रमाणे कपडे, तरकारी, फळे, मासे, चप्पल, किराणामाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बाजारहाट करणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मात्र मोबाईल चोरीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांच्या खिशातील महागडे मोबाईल चोरट्यांना आकर्षित करू लागले आहे. मोबाईलची चोरी करताना चोरट्यांच्या टोळीकडून अतिशय किफायतशीरपणे चोरी केली जाते.चोरट्यांची टोळी बाजारामध्ये येणारे सावज शोधून त्याचा पाठलाग करतात. सावज तरकारी किंवा इतर वस्तू खरेदी करण्यात व्यस्त असताना डाव साधून मोबाईल किंवा पाकीट लंपास केले जाते. बाजाराच्या गर्दीमध्ये अतिशय शिताफीने चोरी केली जात असताना सावजाला सुधा आपली वस्तू गेल्याचे लक्षात राहत नाही. वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात येईपर्यंत मोबाईल स्वीच आॅफ व चोरटे फरार झालेले असतात. काही वेळेस चोरटे सापडतातही त्यावेळेस त्याला लाथा बुक्क्यांचा मारदेखील खावा लागतो. चोरटा रंगेहाथ सापडला तरी पोलिसांची कटकट नको म्हणून त्यांना चोप देवून तसेच मोकळे सोडून दिले जाते. चोरट्यांना बेदम चोप दिला तरीही ते टोळीच्या सदस्यांची व म्होरक्यांची माहिती सांगण्यास तयार नसतात. चोरट्यांमध्ये महिला चोरटे देखील असल्याचे व्यापारी सांगतात. यामुळे मोबाईल चोरट्यांचा मोठा फौजफाटाच तयार झाला असून चोरीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांना कोंडी सोडवता-सोडवताच नाकी नऊ येत असल्याने चोरीच्या घटनांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलिसांची साध्या गणवेशातील पोलीस आठवड्याच्या प्रत्येक बाजारामध्ये पाळतीकरिता ठेवावे यावेत, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापारीवर्ग करीत आहेत. चोरटे पोलिसांच्या हाती लागल्यास मोबाईल चोरट्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो.