शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निलंबन कारवाई सत्तारूढ, विरोधकांत जुगलबंदी

By admin | Updated: April 20, 2017 21:40 IST

महापालिका सभेत राष्टÑवादी काँग्रेसच्या तिघांना निलंबित करण्यात आले. यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधी पक्षातील

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 20 - महापालिका सभेत राष्टÑवादी काँग्रेसच्या तिघांना निलंबित करण्यात आले. यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे सदस्यांमध्ये जुंपली होती. ‘निलबंन मागे घ्यावे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी केली. तर कोणत्याही परिस्थिती निलंबन मागे घेणार नाही अशी भूमिका सत्ताधाºयांनी घेतली. 
 
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना शास्ती आकारण्याच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत, मग पाचशेच स्क्वेअरफुटाला माफी का? असा सवाल विरोधकांनी केला. तर हजार स्क्वेअरफुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती नाही, त्यापुढील बांधकामे ही सामान्य माणसांची नाहीत, त्याच्याकडून शास्ती वसूल करा, अशी मागणी भाजपाने करून शास्ती वसुलीचा विषय मंजूर केला. यावरून गोंधळ घालणाºया चौघांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई चुकीची असून ती माघे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर महापौर आणि पक्षनेते यांचा रिमोट दुसºयांच्या हाती आहे, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे.
 
महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘संबंधितांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निलंबित केले आहे. कारवाई मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझा रिमोट कुणाच्याही हातात नाही. मीच रिमोट आहे.’’
 
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अपयश आल्याने राष्टÑवादीचा हा प्रकार सुरू आहे. केवळ स्टंटबाजी आहे. माझा रिमोट कुणाच्याही हातात नाही. मी निर्णय घेण्यास समर्थ आहे.’’
 
माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘सरसकट चौघांवर कारवाई करणे चुकीचे आहे. आमचा विरोध नोंदवून घेतला नाही. म्हणून आम्ही महापौरांना विचारले त्यांनी इतरांच्या सांगण्यावरून संबंध नसतानाही निलंबन केले. नियमांचे उल्लंघन केले आहे.’’
राष्टÑवादीचे गटनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. कारवाई चुकीची आहे. शास्तीबाबत न्याय मिळण्यासाठी वेळपडल्यास रस्त्यावर उतरले जाईल. शास्तीकराचे टप्पे कशासाठी करता. पूर्णपणे माफी मिळायला हवी.’’
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘अअनधिकृत बांधकामांना पूर्णपणे शास्ती रद्द करावी, ही शिवसेनेची भूमिका आहे. तसेच अशी मागणी होत असताना विरोधीपक्षांतील नगरसेवकांवर अकारण निलंबन कारवाई करण्यात आली. या चुकीच्या गोष्टीला आमचा विरोध आहे.’’
 
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘शास्तीचे राजकारण न करता पूर्णपणे शास्ती माफ व्हायला हवी. कारवाई चुकीची आहे.’’