शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

निवडणुकीच्या तोंडावर वाहन तोडफोडीची ‘स्टंटबाजी‘

By admin | Updated: November 9, 2016 02:39 IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाहनांची तोडफोड करून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दहशत माजविण्यासाठी वाहने फोडायचे आता फॅडच निर्माण झाले आहे

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाहनांची तोडफोड करून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दहशत माजविण्यासाठी वाहने फोडायचे आता फॅडच निर्माण झाले आहे. हे प्रकार रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. शहरात औद्योगिकीकरणासह नागरीकरणही वाढले. दरम्यान, शहर व परिसरातील जमिनींना चांगला भाव आला. यातून काही ‘गुंठामंत्री’ उदयास आले. अनेकांनी आपला दबदबा निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे गट स्थापन केले असून, त्यातून काही टोळ्या उदयास आल्या. अशाच काही टोळक्यांकडून पिंपरी, भोसरी, निगडी, आकुर्डी, थेरगाव या भागात अनेकदा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, सोनसाखळी चोरी या गुन्ह्यांसह आता वाहन तोडफोडीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वाहने घरासमोर उभी करावीत की नाही, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. काही मुले एकत्र येऊन गु्रप तयार करतात. त्यास वेगळ्या पद्धतीचे नावही दिले जाते. त्यानंतर ग्रुपचे नाव ओळखले जावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. दुचाकीची मोठ्या आवाजात फायरिंग करून १५-२० दुचाकी एकत्रित फिरविणे. मोठमोठ्या आवाजात ओरडणे, पादचाऱ्यांना त्रास देणे अशा प्रकारचे उद्योग केले जातात. यातही भागत नाही म्हणून की काय विनाकारण वाहनांची तोडफोड करण्याचेही प्रकार सुरू आहेत. (प्रतिनिधी)काही जण दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करतात. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने रस्त्यावर येत राग व्यक्त केला जातो. यामध्ये सर्वप्रथम ‘टार्गेट’वर असतात ती रस्त्यावरील वाहने. काचा फोडणे, दरवाजा तोडणे, मोटारीवर दगड मारणे यांसह लाठ्या-काठ्या घेऊन गुंडांचे टोळके दहशत माजवीत आहे. आकुर्डीतील साईनाथनगर येथे वाहन तोडफोडीचा प्रकार उघडकीस आला. अनेक जण इमारतीच्या वाहनतळात वाहन लावतात, तर काहींना वाहनतळात जागा उपलब्ध नसल्यास रस्त्यावरच वाहने उभी करतात. नेहमीप्रमाणे घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाहनमालक बिनधास्त जातात. वाहनांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून वाहनाला लक्ष्य कले जात आहे.