शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश ; विविध पदांची भरती बंद केल्याच्या विरोधात मोर्चा

By admin | Updated: October 17, 2016 18:30 IST

राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १७ : राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातीच काढल्या गेल्या नाहीत.परिणामी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एमपीएससी स्टुडेंटस् राईटच्या माध्यमातून 400 हून अधिक अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सोमवारी शनिवारवाडा ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.राज्य शासनाने नोकर भरती वरील कपात त्वरीत उठवावी, राज्यसेवा,विक्रीकर निरीक्षक, वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात.

शासनाच्या कंत्राटी पध्दतीने भरल्या जाणार व सध्या भरण्यात आलेल्या सर्व जागा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भराव्यात. पीएसआय पदाची 2 वर्षे न काढलेली जाहिरात त्वरीत काढावी.1998 पासून बंद झालेली एक्साईस इन्सपेक्टर पदाची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. कृषी सेवकाच्या परीक्षेमध्ये झालेल्या भष्टाचाराची चौकशी करून त्यावर कार्यवाही करावी,आदी प्रमुख मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊन आपला आक्रोश व्यक्त केला.

आमचा मोर्चा राज्य शासनाच्या विरोधात नाही तर विविध पदांच्या भरतीविषयी शासनाने स्वीकरलेल्या धोरणाविरोधत आहे,असे मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तब्बल 25 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रोफाईल तयार झाले आहे. मात्र, त्यातुलनेत विविध पदांची भरती करण्यासाठी एमपीएससीकडून जाहीराती काढल्या जात नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. पूनम डोके,कुमुदिनी पातोडे, राणी डफळ, प्रियदर्शनी पाटील आदी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांशी संवाद साधला.