शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

मतपेटीसाठी सामान्यांच्या जिवाशी खेळ, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 06:05 IST

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावर तोडगा निघाला. शास्तीकर माफीचा निर्णय झाला. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत.

पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावर तोडगा निघाला. शास्तीकर माफीचा निर्णय झाला. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमणविरोधी पथकामार्फत अनधिकृतबांधकामे पाडली जात आहेत. डोळ्यांदेखत अनधिकृत बांधकामे भुईसपाट होत असल्याचे पाहूनही पिंपरी-चिंचवडमधील नागरिक कसलीही पर्वा न करता, राजकीय पाठबळावर विनापरवाना बांधकामे करण्यात व्यस्त आहेत.नुकताच शास्तीकर माफीचा निर्णयसुद्धा झाला. अवैध बांधकामांना अभय देण्यात आणि नागरिकांची घरे वाचविण्यात राजकीय नेत्यांना यश आले. या राजकीय नेत्यांचे सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे लक्ष का जात नाही, की त्यांनी मतपेटीच्या राजकारणास्तव त्याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला आहे, असा संतप्त सवाल सुजाण नागरिक उपस्थित करू लागले आहेत.पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित झालेले शहर असले, तरी या शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाल्याचा राज्यभर बोभाटा आहे. फेब्रुवारी २०११ ला अनधिकृत बांधकामांसंबंधी दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले. तेव्हापासून महापालिकेने विविध प्रकारे अनधिकृत बांधकामे रोखण्याचा विविध प्रकारे प्रयत्न केला. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. त्या कालावधीत तीन वर्षांत सुमारे आठ लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामे महापालिकेने भुईसपाट केली. चार मजल्यांच्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. पत्राशेड पाडली. नदीकाठच्या बांधकामांवर कारवाई झाली. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले. अपुरे मनुष्यबळ, पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळण्यात अडचणी येत असल्याची सबब पुढे करून प्रशासनाने कारवाईबाबत काणाडोळा केला.मुंबईचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला. विशिष्ट दंड आकारून २०१५ नंतरची बांधकामे नियमित करता येतील, असा दिलासादायक निर्णय झाला. २००८ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना शासनाने दुप्पट शास्तीकर लावला. अवैध मिळकतधारकांनी शासन निर्णयाची प्रतीक्षा करीत शास्तीकर भरला नाही. एवढेच नव्हे, तर बहुतांश मिळकतधारकांनी मिळकतकरसुद्धा थकविला आहे.नियमांचे पालन करणाºयांची कोंडीशेजारी राजरोसपणे अवैध बांधकामे करणारे नियम पाळून बांधकामे करणाºयांपुढे अडचणी निर्माण करतात. दोन इमारतींच्या मध्ये हवा खेळती राहणार नाही, ये-जा करणाºयांना जागा पुरेशी उपलब्ध नाही. अशा समस्या अवैध बांधकामे करणाºयांनी निर्माण केल्या आहेत. ज्यांनी रीतसर परवानगी घेऊन, नियमात बांधकामे केली आहेत, त्यांची कोंडी होऊ लागली आहे. शेजारच्याची तक्रार करायची, तर कायमस्वरूपी शत्रुत्व ओढवून घ्यावे लागेल. ही भीती मनात बाळगून ते तक्रार करण्यासही धजावत नाहीत.- महापालिका अधिकाºयांकडे तक्रार केली, तर कोणातरी पुढाºयाचा अवैध बांधकाम करणाºयावर वरदहस्त असल्याचे लक्षात येते. अवैध बांधकामांना कठोर कारवाईने आळा बसण्याची शक्यता धूसर झाली आहे. नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडून आला तरच आळा बसू शकेल, अशी हतबलता शहरातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड