शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

शहरात वीज दुर्घटनेसाठी एका ठिणगीचा अवकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:19 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : डीपीतील विजेच्या धक्क्याने माणसांसह जनावरांचा अपघात

रहाटणी : मागील वर्षापूर्वी चिंचवड येथे विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्या ठिकाणी तेल अंगावर पडून पोपट बनसोडे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अगदी आठवड्यापूर्वी डांगे चौकात डीपीला आग लागून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. असे वारंवार का घडते याकडे महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी किंवा रोहित्राच्या जवळ जाऊन काम करणारे नागरिक काहीच धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे.

गटई कामगार, फळ विक्रते, खाद्यपदार्थ विक्रते, अनधिकृत पार्किंग करणारे वाहनमालक यांसह अनेक व्यावसायिक विद्युत रोहित्र, डीपी, ट्रान्सफार्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत. एखादा अपघात होण्याच्या आगोदरच त्यांना आवर घालण्याची गरज आहे. सध्या रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसराती अनेक मिनी विद्युत डीपी उघडेच आहेत़ त्यामुळे अपघात होऊ शकतात.

रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरात अनेक व्यावसायिक विद्युत डीपी, उघडे रोहित्र, ट्रान्सफार्मरच्या जवळ किंवा त्याखाली बसून व्यवसाय करीत आहेत. मात्र हा प्रकार कधीतरी जिवावर बेतणारा आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.चिंचवड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बनसोडे हे अनेक वर्षांपासून येथे गटई काम करीत होते़ मात्र आशा प्रकारे त्यांचा अंत होईल असे त्यांनाही माहीत नव्हते. बनसोडे हे अपंग होते़ त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारची हालचाल करता आली नाही. तर डांगे चौकातीलअपघात का व कसा झाला हे आता तरी कोणालाही सांगता येत नाही त्यात एक अज्ञात व्यक्ती पूर्ण जाळून खाक झाला म्हणून यापासून सर्वांनीच धडा घेणे गरजेचे आहे़ तसेच याकडे विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.उघड्या वीजवाहिन्यांलगत टाकला जातो कचरा४रहाटणी येथील गारमळा कॉलनी समोर विद्युत डीपी आहे़ या विद्युत डीपीखाली मागील अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो़ मात्र या डीपीतून बाहेर आलेले काही वायर मोकळे आहेत़ त्या चालू की बंद हे जरी माहीत नसले तरी या ठिकाणी वायरी चालू असतील तर मोठा अपघात होऊ शकतो़ काही वाहनचालक या डीपीला अगदी लागूनच वाहने पार्क करतात़ त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरण कंपनीने ही वायर बंद असतील तर ते काढून टाकावेत व सुरू असतील तर त्याची योग्य काळजी घ्यावी़ त्यामुळे एखादा अनर्थ टळू शकतो़