शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

दौंडच्या दक्षिण भागात पेरणीची लगबग सुरू

By admin | Updated: September 26, 2014 05:50 IST

दौंड तालुक्यामधील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त भाग म्हणून दक्षिण पट्टयाची ओळख निर्माण झाली आहे.

खोर : दौंड तालुक्यामधील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त भाग म्हणून दक्षिण पट्टयाची ओळख निर्माण झाली आहे. परंतू या दक्षिण पट्टयामध्ये आॅगस्ट अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.जून च्या पावसाने धडी मारली असल्याने या भागामधील खरीप पिकाचा हंगाम कोलमडून पडला गेला होता. शेतकऱ्यांची उभीची-उभी पिके जळून गेली होती. मात्र आॅगस्टच्या शेवटी काही ठिकाणी मुसळदार तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असल्याने विहीरी, ओढे, नाले, तलाव यांना भरभरुन पाणी आले असल्याने दक्षिण पट्टयामध्ये असलेल्या खोर, देऊळगाव गाडा, नारायणबेट, माळवाडी, पडवी, कुसेगाव या परिसरामधील शेतकरी वर्गाने रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.रब्बी पिकांव्यतीरीक्त फेक कांदा, लागण कांदा, भाजी पाल्यांची पिके घेण्यात या भागातील शेतकरी मग्न झाला आहे. कोणी बैलजोडींच्या साहयाने तर कोणी ट्रॅक्टरच्या साहयाने रब्बी हंगामाची पेरणी करत आहे. या परिसरामध्ये बैलजोडींच्या साहयाने पेरणीला एकरी २५०० रुपये इतका भाव दिला जात असून ट्रॅक्टरच्या साहयाने रब्बी हंगामाच्या पेरणीला १८०० रुपये इतका भाव दिला जात आहे. काही ठिकाणच्या परिसरामध्ये जास्त पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेताजमिनी पुर्णपणे ओलीताखाली गेल्या असल्याने त्या ठिकाणी पेरणी करणे देखील मुश्कील झाले आहे. शेतजमिनी मधील पाणी आटण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ आली आहे तर काही ठिकाणच्या परिसरामध्ये कमी पाऊस व त्याच वेळी पेरणी केलेल्या शेतामध्ये जास्त उष्णतेमुळे पिके जळून गेली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे. परंतू एकंदरीत रब्बी हंगाम तरी चांगल्या प्रकारे डौलारा धरील अशी अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाची आहे. (वार्ताहर)