शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

काही उमेदवार सैरभर, तर बहुतांश हतबल

By admin | Updated: September 27, 2014 07:30 IST

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र राजकीय चित्र बदलले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडून आल्या

पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र राजकीय चित्र बदलले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडून आल्या. त्यातच गुरुवारी युती तुटली. आघाडी फुटल्यामुळे उमेदवारीअर्ज भरण्यास एकच दिवस उरला असल्याने इच्छुक सैरभर झाले. बांधलेले अंदाज, आडाखे फोल ठरल्याने अनेकांवर हतबल होण्याची वेळ आली.विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष या प्रमुख पक्षांमधील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला. मोदींच्या लाटेवार स्वार होण्याचे स्वप्न बाळगून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गजसुद्धा भाजप, शिवसेनेच्या वाटेवर होते. कोणत्याच पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वसुद्धा नाही, अशा इच्छुकांनीही भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पक्षप्रवेश करता येईल, या उद्देशाने त्यांनी भाजपची उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न केले. काहींनी भाजपमध्ये प्रवेशसुद्धा केला. या घडामोडी सुरू असतानाच गुरूवारी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली. युती तुटल्याचे जाहीर होते ना होते तोच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतसुद्धा फूट पडली. युती, आघाडी संपुष्टात येताच विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आखलेली समीकरणे कोलमडली. उमेदवारी भरण्यासाठी एकच दिवस उरला असताना, युती, आघाडी संपुष्टात आल्याने निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक असलेल्यांना सैरभर धाव घ्यावी लागली. उमेदवारी मिळविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. युतीच राहिली नाही, तर भाजप वा शिवसेना यांपैकी एका पक्षाची उमेदवारी मिळणे फायद्यात ठरणारे नाही, असा विचार करून काहींनी उमेदवारी नाकारली, तर काहींना उमेदवारी मिळणार नाही, असेऐनवेळी सांगण्यात आल्याने धक्काच बसला. अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्याने आता काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. (प्रतिनिधी)