शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

लाखोंच्या फटाक्यांचा धूर; लग्न, वाढदिवसानिमित्त केली जाते आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 02:57 IST

सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे.

रहाटणी : सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश लग्नसोहळे सायंकाळी होत असल्याने या प्रकारांत वाढ होत आहे. आनंद व्यक्त करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येत आहे. यातून ध्वनी आणि वायुप्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,गरोदर महिला यांना अनेक प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागत आहे; तसेच मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांचे तर वायू व ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश मंगल कार्यालये दाट नागरी वस्तीत आहेत. लग्न म्हटले की आतषबाजी असे समीकरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. आतषबाजीचे सर्वत्र जणू फॅड असल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र या आतषबाजीसाठी फटाके किती वाजवावेत याचे भान कोणालाही राहिलेले नाही. फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे हृदय रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.लग्नाच्या वरातीत आणि मंगलाष्टके पूर्ण होताच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. हजारो फटाक्यांच्या माळा व आकाशात झेपावणारे फटाके वाजविले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासह वायुप्रदूषणही होत आहे. ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांवर रुपये लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. या आनंदाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांमध्ये दम्यासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत. दम्याचा आजार असलेल्या जेष्ठांचे जगणे कठीण झाले आहे.प्रदूषण रोखण्याचा देखावाएका बाजूला शासन ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असल्याचा देखावा करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कुचकामी ठरली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचा आजार जडला आहे. वायुप्रदूषणमुक्तीचा नारा देणाºयाच अनेक राजकीय व्यक्ती आणि कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यातून फटाके वाजविण्यात येतात.‘भाऊ’, ‘दादां’चा वाढदिवसशहरातील प्रत्येक घरात राजकीय पक्षांनी प्रवेश मिळविला आहे. घराघरांपर्यंत पोचलेल्या या राजकीय पक्षांमुळे शहरातील गल्ली-बोळातही ‘भाऊ’, ‘दादा’ तयार झाले आहेत. अशा ‘भाऊ’ आणि ‘दादां’ना स्वत:चा वाढदिवस दिमाखात साजरा करण्याची हौस असते. या हौसेपोटी मध्यरात्री फटाके वाजविण्यात येतात. मोठी आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे गल्ली बोळातील या ‘भाऊ’ आणि ‘दादां’च्या वाढदिवसाच्या आतषबाजीचा शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो.विद्यार्थ्यांना नाहक त्राससध्या परीक्षांचा कालावधी आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असतात. अशा विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगल कार्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.मंगल कार्यालयांवर कारवाईची गरजफटाके वाजविणे आणि आतषबाजी याबाबत नियमावली आवश्यक आहे. मंगल कार्यालय आणि परिसरात फटाके वाजविणे आणि आतषबाजीला निर्बंध आवश्यक आहेत. अतिप्रमाणात फटाके वाजविण्यात येणाºया मंगल कार्यालय मालक आणि चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड