शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सिग्नलची अद्याप प्रतीक्षाच!

By admin | Updated: April 25, 2017 04:10 IST

येथील चौकात नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे पादचारी व वाहनचालंकाना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

निगडी : येथील चौकात नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे पादचारी व वाहनचालंकाना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या चौकात सिग्नल बसविण्याची जोरदार मागणी होत आहे. या चौकातून चाकण, तळवडे, भोसरी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आसते. तसेच या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतूक करणारे कंटेनर, ट्रक कंपन्याच्या बसगाड्या, मोटारी आणि दुचाकी वाहनांची या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. तसेच याच चौकातून मोठी लोकवस्ती असलेल्या रूपीनगर, साईनाथनगर, यमुनानगर या भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.या चौकात सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत ये-जा सुरू असते. मात्र, अंकुश चौकात वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांसह जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविल्यास विद्यार्थ्यांना व पालकांना रस्ता ओलांडताना सुरक्षितता लाभेल. सिग्नल नसल्याने वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते. भक्ती-शक्तीकडून चाकण, भोसरीकडे जाणारी अवजड वाहने स्पाईन रोडने भरधाव वेगात येतात; परंतु या चौकात कोणतेही गतिरोधक अस्तित्वात नसल्याने हा रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांची अनेकदा धांदल उडते. चौकात सिग्नल नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी वाट पहावी लागते. त्यात रिक्षाचालक रस्ता रिकामा होण्याची वाट न पाहता धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडले आहेत. याच चौकात मजूर अड्डा असल्याने गर्दीत भर पडत आहे. चौकातच दारू अड्डा असल्याने अनेक मद्यपी रस्त्यात झोकांड्या खात मध्येच उभे असतात. त्यामुळे अनेक वेळा वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच याच चौकात रस्त्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ़ बासाहेब आंबेडकर कमान आहे. ही कमान रस्त्याच्या बरोबर मध्यभागी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांस अडथळा ठरत आहे. ही कमान फार जुनी व जीर्ण झाल्याने मोडकळीस आली आहे. एखाद्या भरधाव वाहनाचा धक्का लागल्यास मोठा अपघात होऊ शकतो. या कमानीचे नूतनीकरण करण्यासाठी व चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कार्येकर्त्यांनी अंदोलने केली. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे नेमीच कानाडोळा केला आहे. या आधी अंकुश चौकातील सिग्नल बसविणे व कमानीचे नूतनीकरण करण्यात यावे याबाबत लोकमतने बातमी प्रसिद्ध केली होती. संबंधित पालिका अधिकाऱ्याने सिग्नल बसविण्याची निविदा मंजूर झाली असून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. स्थायी समितीकडून हिरवा सिग्नल मिळताच लवकरात लवकर सिग्नल बसविण्यात येतील, असे अश्वासन दिले होते. पंरतु, चार महिन्याचा काळ उलटूनदेखील या चौकातील समस्येची कोणतीच दखल घेतलेली नाही. यावरून प्रशासन नागरिकांच्या जीवाशी किती दिवस खेळणार आहे, असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)