शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

उद्योजकांकडून भूखंडाचे ‘श्रीखंड’

By admin | Updated: September 21, 2015 04:04 IST

पिंपरी, भोसरी व चिंचवड भागात उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड खरेदी केले जातात

नीलेश जंगम, पिंपरीपिंपरी, भोसरी व चिंचवड भागात उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड खरेदी केले जातात. तेथे काही काळापुरता उद्योग-व्यवसाय केला जातो. नंतर याच भूखंडावर इमले बांधून तिथे संसार केला जातो. काही ठिकाणी ‘नीचे मकान उपर दुकान’ अशी परिस्थिती आहे. दाखवण्यापुरते व्यवसाय केले जातात किंवा एखाद-दुसरे बंद यंत्र ठेवले जाते. मात्र, वरच्या मजल्यावर राहण्यासाठी घरे बांधली जातात. उद्योगासाठी कमी दरात एमआयडीसीकडून भूखंडाची खरेदी केली जाते. मात्र, ते भूखंड निवासासाठी लाटले जाऊन एमआयडीसीची फसवणूक केली जात आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. दुसरीकडे उद्योगनगरीत मंदीचे सावट पसरले आहे. इतर जागांच्या तुलनेत एमआयडीसीचा भूखंड कमी दरात मिळतो. यामुळे अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून एमआयडीचे भूखंड खरेदी केले जातात. उद्योग न चालल्यास राहण्यासाठी किमान घर तरी होईल, या हेतूने राजरोसपणे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. नियमानुसार एमआयडीसीचा भूखंड खरेदी केल्यानंतर ठरावीक कालावधीत विकसित न केल्यास एमआयडीसीकडून कारवाई केली जाते. काही उद्योजकांना येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना एमआयडीसीकडून घेतलेल्या भूखंडाचा लाभ घेता येत नाही. दिलेल्या मुदतीत व्यवसाय सुरू न करता आल्याने ते अपात्र ठरतात. यामुळे त्यांच्याकडून भूखंड जप्त केले जातात. परंतु, उद्योजकांसाठीचे भूखंड निवासी वापरासाठी घेणाऱ्यांकडे एमआयडीसीचे अधिकारी डोळेझाक करतात. अशा प्रकारचे भूखंड विक्री करण्यामध्ये एमआयडीसीचेच काही अधिकारी, कर्मचारी, तर काही निवृत्त अधिकारीही सक्रिय आहेत. औद्योगिकचे निवासी व व्यापारी भूखंडात रुपांतर करण्याची तरतूद झाली. लोकवस्तीच्या भागातल्या औद्योगिक भूखंडांचे निवासी व व्यापारी भूखंडात रुपांतर करण्याकरिता परवानगी मिळाली. असे अनेक भूखंड रुपांतरित झाले. भारनियमनाची चिंता नाहीउद्योजक म्हणून ज्या सोयी-सुविधा मिळतात, त्याचा फायदा निवासासाठी केला जातो. एमआयडीसीकडून वीज, पाणी व इतर सुविधा मुबलक प्रमाणात मिळतात. शहरातील इतर रहिवासी भागाच्या तुलनेत या सुविधा महाग असल्या, तरी पूरक प्रमाणात मिळतात. या सुविधांचा लाभ घेत लोक येथे पिढ्यान्पिढ्या राहत आहेत. शहरातील अनेक भागांत पाण्याची कमतरता आहे. अनेक सोसायट्यांमध्ये शेवटच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. एमआयडीसीत विजेच्या बाबतही विजेच्या भारनियमानाची चिंता नसते. अधिकाऱ्यांशी हातमिळवणीएमआयडीसीकडून घेतलेल्या भूखंडाचा पुरेपूर वापर केला जातो. एकाच छताखाली कारखाना, कार्यालय, घर सगळेच उभारण्यात येते. अनेक ठिकाणी तर पिढ्यान्पिढ्या लोक राहत असल्याचे चित्र पाहायला मिळते. इतर ठिकाणी कामाला असणाऱ्या नातेवाइकांसह लोक या भूखंडाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. अनेकांना उद्योगातले काहीही ज्ञान नसतानही केवळ नावाला दिखाव्यासाठी एखादे यंत्र ठेवले आहे. एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचारी यांना हाताशी धरून भूखंड घेतले जात असल्याने बिनधास्तपणे व राजरोसपणे या भूखंडावर संसार थाटले जात आहेत.