शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

कर्मचारी राहत असलेली दुकाने धोकादायक

By admin | Updated: January 1, 2017 04:35 IST

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी छोट्या जागेत दुकान आहे, त्या दुकानातच कर्मचारी राहतात. अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरतात.

पिंपरी : अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी छोट्या जागेत दुकान आहे, त्या दुकानातच कर्मचारी राहतात. अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरतात. पुण्यात कोंढव्यात बेकरीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील बेकरी कितपत सुरक्षित आहेत, याचा आढावा घेतला असता, महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी बेकरी अथवा दुकानातच कर्मचारी राहतात, अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरू शकतात, असे निरीक्षण नोंदवले आहे. पुण्यातील कोंढवा येथे घडलेल्या दुर्घटनेचे कारणसुद्धा हेच असल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी नमूद केले. ते म्हणाले, जसे पेट्रोल पंप, गॅस एजन्सी या ठिकाणी कधीही धोकादायक स्थिती उद्भवू शकते, तसे बेकरीचे नाही. अग्निशामक दलाच्या दृष्टीने धोकादायक आस्थापनामध्ये बेकरीचा समावेश होत नाही. बेकरीचा माल उत्पादन करण्यासाठी भट्टीचा वापर होतो. बहुतांशी हॉटेलमध्येही भट्टी असते. त्यामुळे अशा आस्थापनांमध्ये दक्षतेच्या उपायययोजना केल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले जात नाही, असेही अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड परिसरात ‘निचे दुकान, उपर मकान ’ अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. छोट्या जागेत सुरू केलेल्या दुकानांमध्ये पोटमाळ्यावर कामगारांना झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असते. अगोदरच कमी जागा, त्यात दुकानाच्या साहित्याबरोबर कामगारांच्या साहित्याची भर पडते. छोटेखानी दुकानात जागेच्या कानाकोपऱ्यांत वस्तू ठेवल्याने खोली भरगच्च होते. दुकान खाद्यपदार्थ तयार करण्याचे नसले, तरी राहणाऱ्या कामगारांसाठी तेथे रॉकेलचा स्टोव्ह अथवा गॅस उपलब्ध करून दिलेला असतो. कधी तरी त्या कामगारांपैकी कोणी हलगर्जीपणा दाखवला, तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. पिंपरी-चिंचवडमध्ये किराणा मालाच्या दुकानात कुटुंबासह राहणारे काही व्यापारी आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये अशीच परिस्थिती असते. गादी तयार करण्याची छोटी दुकाने अर्थात गादी कारखाने अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडण्यास पूरक परिस्थिती निमाण होते. त्या ठिकाणी त्या लोकांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. दुकानात कामगारांना राहण्यास मुभा नसावी. कामगारांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. (प्रतिनिधी)कुदळवाडी आगीच्या घटनांचे आगार चिखली, कुदळवाडी परिसरात महिन्यात एकदा तरी आगीची घटना घडतेच. चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांना मोठ्या स्वरूपात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. भंगार मालाची तसेच लाकडी वस्तूंची गोदामे, दुकाने एकाला एक चिकटून आहेत. सुमारे बारा ते चौदा तास येथील आग आटोक्यात येत नाही. अग्निशामक दलाचे बंब, पाण्याचे कित्येक टँकर खाली करावे लागतात. या घटना वारंवार घडू लागल्या असताना, कोणत्याही दक्षतेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत.