शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

By विश्वास मोरे | Updated: February 29, 2024 13:11 IST

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे....

पिंपरी : इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे  प्रत्येक दिवशी ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित केला आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषण पातळीबाबत नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डायरेक्टरेटने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये नदीच्या प्रदूषण पातळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील औद्योगिक कारखाने, गोदामे आणि अनधिकृत व्यवसायांमधून रासायनिक पाणी, तेल व ग्रीसचे होणारे विसर्जन यातून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुदळवाडी जाधववाडी येथील नाल्यालगतचे अतिक्रमण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मोकळे करण्यात आले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा होतोय पुर्नवापर

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी व्यावसायिक, नागरिक, बांधकाम व्यावसायिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रोत्साहन देत आहे. यासाठी प्रक्रिया केलेले पाणी पाच मिनिटांत टँकरमध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाण्याचा वापर केल्याने नदीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

इंद्रायणी नदीचे रक्षण हेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासारख्या शाश्वत उपायांची अंमलबजावणी करून प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देत आहे. यातून समाजाचे व पर्यावरणाचे कल्याण होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नदी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी म्हणजे एक महत्वाचा टप्पा आहे. महापालिका प्रदुषणासारख्या विषयांवर नाविन्यपूर्ण उपायांचा वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या सुचनेनूसार आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय पावले उचलत आहे.

- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका