पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवार पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे आता दिवसाला १५० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. पाण्याची अशीच बचत झाल्यास सध्याच्या उपलब्ध पाणी साठ्यात जुलै महिन्यापर्यंत शहराची तहान भागू शकेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने वर्तविला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या पावसाळ्यात केवळ ऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला. सध्या त्यातील २६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जुलै महिन्यांपर्यंतचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडून पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला दररोज पवना नदीपात्रातून ४५० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपातळी घटू लागल्याने पहिल्या टप्प्यात दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आली. यामुळे दिवसाला ४५ एमएलडी पाण्याची बचत होत होती. त्यानंतर पुन्हा पाच टक्के कपात वाढविण्यात आल्याने एकूण पंधरा टक्के पाणीकपातीमुळे दिवसाला ७० एमएलडीपाण्याची बचत होऊ लागली. (प्रतिनिधी)
दीडशे एमएलडी पाण्याची बचत
By admin | Updated: May 3, 2016 03:27 IST