शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहाचे प्रमाणपत्र बंधनकारक

By admin | Updated: February 3, 2017 04:13 IST

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले आहे.

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले आहे. यासंबंधीचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा आदेशात म्हटले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विविध कागदपत्रे, संमतिपत्रे भरणे अत्यावश्यक असून, त्यात आणखी एका प्रमाणपत्रांची भर पडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, अकोला, अमरावती, नागपूर या महापालिकांना पत्र पाठविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य होण्यासाठी उमेदवाराकडे स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. त्याचा वापर करीत असणे, अशी तरतूद अधिनियमात केली आहे. यानुसार २ जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी अधिसूचना १६ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी ‘शौचालय आहे, त्याचा नियमित वापर केला जातो,’ असे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शासनादेश पारित केला आहे. निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून महापालिकेतील उमेदवारांना असे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विभागांना आदेश द्यावेत, असे सूचित केले आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही प्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर २४ तासांत अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.(प्रतिनिधी)पडताळणीचा प्रशासनावर ताणएकीकडे निवडणुकीचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे. त्यातच आता इच्छुक उमेदवारांना आणखी एक प्रमाणपत्र काढण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम वाढले आहे. अर्ज मिळाल्यानंतर संबंधित प्रभागातील आरोग्य निरिक्षकाने संबंधित अर्जदाराच्या घरास भेट द्यायची असून त्या अर्जदाराच्या घरात स्वच्छतागृह आहे किंवा नाही, याची पाहणी करायची आहे. तसेच संबंधित ठिकाणाचा पुरावा, त्यावरील टिपण्णी सादर करून प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यायची असून त्यानंतर प्रभाग अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संबंधित व्यक्तीला प्रमाण पत्र दिले जाणार आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर ताण येणार आहे. याबाबत नव्याने यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.