शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
2
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
5
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
6
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
7
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
8
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
9
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
10
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
11
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
12
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
13
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
14
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
15
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
18
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
19
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
20
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

स्वच्छतागृहाचे प्रमाणपत्र बंधनकारक

By admin | Updated: February 3, 2017 04:13 IST

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले आहे.

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले आहे. यासंबंधीचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा आदेशात म्हटले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विविध कागदपत्रे, संमतिपत्रे भरणे अत्यावश्यक असून, त्यात आणखी एका प्रमाणपत्रांची भर पडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, अकोला, अमरावती, नागपूर या महापालिकांना पत्र पाठविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य होण्यासाठी उमेदवाराकडे स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. त्याचा वापर करीत असणे, अशी तरतूद अधिनियमात केली आहे. यानुसार २ जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी अधिसूचना १६ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी ‘शौचालय आहे, त्याचा नियमित वापर केला जातो,’ असे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शासनादेश पारित केला आहे. निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून महापालिकेतील उमेदवारांना असे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विभागांना आदेश द्यावेत, असे सूचित केले आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही प्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर २४ तासांत अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.(प्रतिनिधी)पडताळणीचा प्रशासनावर ताणएकीकडे निवडणुकीचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे. त्यातच आता इच्छुक उमेदवारांना आणखी एक प्रमाणपत्र काढण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम वाढले आहे. अर्ज मिळाल्यानंतर संबंधित प्रभागातील आरोग्य निरिक्षकाने संबंधित अर्जदाराच्या घरास भेट द्यायची असून त्या अर्जदाराच्या घरात स्वच्छतागृह आहे किंवा नाही, याची पाहणी करायची आहे. तसेच संबंधित ठिकाणाचा पुरावा, त्यावरील टिपण्णी सादर करून प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यायची असून त्यानंतर प्रभाग अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संबंधित व्यक्तीला प्रमाण पत्र दिले जाणार आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर ताण येणार आहे. याबाबत नव्याने यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.