शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीकरांच्या तोंडचे पळाले पाणी

By admin | Updated: April 27, 2017 05:05 IST

मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

रहाटणी : मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात फिरून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे, त्यामुळे रहाटणीकरांवर कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. कमी दाबाने व अपुरा तसेच वेळी अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील नागरिक रात्र जागून काढीत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दररोज नको, मात्र एक दिवसाआड का होईना; पण पाण्याचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.रहाटणी, काळेवाडी परिसरात प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरात भाडेकरुंची संख्या लक्षणीय असल्याने अनेकांकडे पाणी साठविण्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था नसल्याने अनेकांची पंचाईत होत आहे. राज्यातील नव्हे तर राज्याबाहेरील ग्रामीण भागातील अनेक कुटुंब शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत. भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक, महिला बिगारीकाम करतात तर काही महिला घरकाम करतात. यासाठी सर्वांनाच लवकर कामावर जावे लागते़ मात्र, सध्या पाण्यासाठी रात्र जागवावी लागत असल्याने काहीवेळा कामावर खाडे करून घरी थांबवावे लागत आहे.महात्मा फुले कॉलनी, सिद्धार्थनगर, सायली पार्क १, २, रामनगर, रहाटणी गावठाण या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत तर रात्री आठनंतर असा उशिरा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागांत तर रात्री साडेनऊ नंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे. मागील काही दिवसांपासून रामनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र, भाडेकरू पाणी साठविणार कशात हा प्रश्न आहे. रहाटणी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ त्या बांधकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात आहे. त्यासाठी अनेक मिळकतधारक मोटारीने पाणी घेत आहेत़ ज्या नागरिकांकडे मोटार नाही त्यांना पाणी मिळतच नाही़ त्यामुळे अशा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)