शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

रहाटणीकरांच्या तोंडचे पळाले पाणी

By admin | Updated: April 27, 2017 05:05 IST

मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

रहाटणी : मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात फिरून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे, त्यामुळे रहाटणीकरांवर कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. कमी दाबाने व अपुरा तसेच वेळी अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील नागरिक रात्र जागून काढीत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दररोज नको, मात्र एक दिवसाआड का होईना; पण पाण्याचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.रहाटणी, काळेवाडी परिसरात प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरात भाडेकरुंची संख्या लक्षणीय असल्याने अनेकांकडे पाणी साठविण्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था नसल्याने अनेकांची पंचाईत होत आहे. राज्यातील नव्हे तर राज्याबाहेरील ग्रामीण भागातील अनेक कुटुंब शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत. भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक, महिला बिगारीकाम करतात तर काही महिला घरकाम करतात. यासाठी सर्वांनाच लवकर कामावर जावे लागते़ मात्र, सध्या पाण्यासाठी रात्र जागवावी लागत असल्याने काहीवेळा कामावर खाडे करून घरी थांबवावे लागत आहे.महात्मा फुले कॉलनी, सिद्धार्थनगर, सायली पार्क १, २, रामनगर, रहाटणी गावठाण या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत तर रात्री आठनंतर असा उशिरा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागांत तर रात्री साडेनऊ नंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे. मागील काही दिवसांपासून रामनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र, भाडेकरू पाणी साठविणार कशात हा प्रश्न आहे. रहाटणी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ त्या बांधकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात आहे. त्यासाठी अनेक मिळकतधारक मोटारीने पाणी घेत आहेत़ ज्या नागरिकांकडे मोटार नाही त्यांना पाणी मिळतच नाही़ त्यामुळे अशा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)