शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

रहाटणीकरांच्या तोंडचे पळाले पाणी

By admin | Updated: April 27, 2017 05:05 IST

मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

रहाटणी : मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात फिरून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे, त्यामुळे रहाटणीकरांवर कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. कमी दाबाने व अपुरा तसेच वेळी अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील नागरिक रात्र जागून काढीत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दररोज नको, मात्र एक दिवसाआड का होईना; पण पाण्याचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.रहाटणी, काळेवाडी परिसरात प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरात भाडेकरुंची संख्या लक्षणीय असल्याने अनेकांकडे पाणी साठविण्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था नसल्याने अनेकांची पंचाईत होत आहे. राज्यातील नव्हे तर राज्याबाहेरील ग्रामीण भागातील अनेक कुटुंब शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत. भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक, महिला बिगारीकाम करतात तर काही महिला घरकाम करतात. यासाठी सर्वांनाच लवकर कामावर जावे लागते़ मात्र, सध्या पाण्यासाठी रात्र जागवावी लागत असल्याने काहीवेळा कामावर खाडे करून घरी थांबवावे लागत आहे.महात्मा फुले कॉलनी, सिद्धार्थनगर, सायली पार्क १, २, रामनगर, रहाटणी गावठाण या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत तर रात्री आठनंतर असा उशिरा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागांत तर रात्री साडेनऊ नंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे. मागील काही दिवसांपासून रामनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र, भाडेकरू पाणी साठविणार कशात हा प्रश्न आहे. रहाटणी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ त्या बांधकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात आहे. त्यासाठी अनेक मिळकतधारक मोटारीने पाणी घेत आहेत़ ज्या नागरिकांकडे मोटार नाही त्यांना पाणी मिळतच नाही़ त्यामुळे अशा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)