शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सत्ताधारी विरोधकांत हमरी-तुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 06:12 IST

रिंगरोड, उपसूचना न घेणे, तीन टक्क्यांचे राजकारण, नगरसेवकांचे निलंबन, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार या विषयांवरून महापालिकेत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : रिंगरोड, उपसूचना न घेणे, तीन टक्क्यांचे राजकारण, नगरसेवकांचे निलंबन, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार या विषयांवरून महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांत जुगलबंदी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांनी नेत्यांकडून केवळ तोंडसुख घेण्याचे काम सुरू आहे.गेल्या काही महिन्यांत महापालिकेचे सभागृह चालविण्यात सत्तादारी भाजपाला अडचण येत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादविवाद सुरूच आहेत. सर्वसाधारण सभेत विरोधकांना बोलू न देणे, रिंगरोड आणि शहरातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा घडवून न देणे यावरून केवळ तोंडसुख घेतल जात आहे. उपसूचनांमधून भ्रष्टाचार होतो, म्हणून उपसूचना देणार नाही, अशी भूमिका भाजपाने घेतली होती. हाच धागा पकडून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी उपसूचनांतून भ्रष्टाचार होतो, तर सत्ताधारीच उपसूचना देत असल्याचे बहल आणि माजी महापौर मंगला कदम यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावरून महापौर नितीन काळजे यांनी आम्ही काय कोणती आरक्षण बदलाची, बिल्डरच्या फायद्याची उपसूचना दिली नव्हती, नागरिकांच्या हिताच्याच उपसूचना होत्या. उपसूचना देणे माझा अधिकार आहे, हा विरोधकांचा आडमुठेपणा आहे, असे विधान केले. तसेच स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही जोरदार टीका केली. महापालिकेतील दुकानदारी बंद झाल्याने राष्ट्रवादी आरोप करीत आहे, असा आरोप पवार यांनी केला होता. तसेच महापौरांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादीने माफी मागावी अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असे विधान सावळे यांनी केले होते. आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात महापौरांनी सभा उरकली होती. विरोधकांना रिंगरोडवर चर्चा होऊ द्यायची नव्हती, असा आक्षेप भाजपाने घेतला आहे. नागरी समस्या प्रलंबित विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे महापालिका सभेत शहरातील आरोग्य, अपुरा पाणीपुरवठा, स्वाइन फलूचा वाढता प्रादूर्भाव, रिंगरोड या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. सत्ताधारी आणि विरोधक केवळ आरोप-प्रत्यारोप करून केवळ तोंडसुख घेण्याचे काम सुरू आहे.