शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: July 21, 2015 03:42 IST

दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे

किवळे : दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. भात व खरीप पिकासाठी हा पाऊस अत्यंत पोषक असला, तरी भातलागवडीसाठी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.देहूरोड, किवळे, रावेत, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे भागात दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या हलक्या पावसाने पेरणी केलेल्या भुईमूग, कडधान्ये, भातरोपांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या उघडिपीने भुईमूग, घेवडा, मूग, पावटा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते. नदीच्या अगर विहिरीच्या पाण्याची सोय असलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांची भातलागवड झाली असून, पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भातरोपे जळू लागली होती. हा पाऊस भातपीक व खरिपाच्या पिकांसाठी अनुकूल असला, तरी पिकांच्या जोमदार वाढीसाठी दमदार पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने भातलागवड करण्यासाठी बहुतांश शेतकरी चांगल्या, दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, काही शेतकरी मात्र भातलागवडीची तयारी करीत असल्याचे दिसत होते. पाऊस पडत असतानाही काहींनी विहिरीचे पाणी खाचरात सोडून दिले होते. शिरगावसह पवन मावळात पावसाची जोरदार हजेरीशिरगाव : गेली अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने शिरगावसह पवन मावळात जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. शिरगाव, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, कासारसाई, सोमाटणे, परंदवडी, चांदखेड परिसरात पावसास सुरुवात झाली. मागील काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसामुळे जमिनीवर माना टाकलेली पिके तजेलदार दिसू लागली आहेत. या पावसाचा फायदा भुईमूग, भात, सोयाबीन, चवळी, मूग, घेवडा आदी पिकांसह उसालादेखील होणार आहे. काही ठिकाणी पावसाअभावी रखडलेल्या पेरणीच्या कामाला पावसामुळे पुन्हा वेग येणार आहे. भातरोपांनाही पावसामुळे जीवनदान मिळाले असून, लागवडीसाठीपोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भातलागवड करण्यास सुरुवात केली आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाली असल्याने दुबार पेरणीचा प्रश्न सुटला असल्याचे मत शिरगाव येथील भानुदास गोपाळे यांनी सांगितले.(वार्ताहर)