शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा सप्ताहाची वाट

By admin | Updated: January 10, 2017 02:56 IST

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने २८ वा रस्ते सुरक्षा सप्ताहाची घोषणा करण्यात आली. आजपासून या

पिंपरी : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने २८ वा रस्ते सुरक्षा सप्ताहाची घोषणा करण्यात आली. आजपासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे. येथील भर रस्त्यात पडलेले बॅरिकेट, जागृतीफलक पाहून मात्र शहरात या सप्ताहाची पहिल्याच दिवशी ‘ऐशी की तैशी’ झाल्याचे पाहायला मिळाले. वाहतूककोंडी, वाढते अपघात यांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनच्या वतीने ९ ते १५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सकाळी काही काळ वाहतूक पोलिसांकडून सिग्नलला उत्तम वाहतूक नियमन केले जात होते. मात्र पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दुपारच्या वेळी वाहतूक नियमनासाठी वापरण्यात येणारे बॅरिकेट भर चौकात अस्ताव्यस्तपणे पडले होते.तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियम व सुरक्षेविषयी जनजागृती करणारा फलकदेखील तुटलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे वाहनचालकांचा या चौकात  गोंधळ उडत होता. सुरक्षा  सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी  वाहतूक पोलिसांच्या साहित्याची ही अवस्था पाहून वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.  तसेच रस्त्यावर पडलेल्या बॅरिकेटमुळे अनेक दुचाकीचालक गडबडले. अनेक वेळ हे साहित्य रस्त्यावरच पडून होते. एरवी रस्ता सुरक्षा सप्ताह आला की, सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागते; पण यंदा हा सप्ताह सुरू असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी वाट लावण्यात आली, अशी टीका परिसरातील नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.(प्रतिनिधी)केवळ सप्ताहावेळीच तत्परता  आज सकाळपासून निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात सुमारे चार ते पाच वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन केले जात होते. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने थांबविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे आज येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे जात होते. मात्र केवळ मंत्री आल्यानंतर किंवा वाहतूक सप्ताहावेळीच वाहतूक पोलिसांकडून इतके तंतोतंत वाहतुकीचे नियमन केले जाते.  इतर वेळी मात्र केवळ वाहनांवर कारवाई करण्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे वाहनचालकांना झेब्रा क्रॉसिंग काय प्रकार आहे, हे देखील लक्षात राहत नाही व वाहतुकीचे तीन-तेरा वाजतात. त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहात या तत्परतेने वाहतुकीचे नियमन केले जाते. ते वर्षभर काय राहावे, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.