शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रस्ते खोदाईची कामे संथगतीने

By admin | Updated: May 9, 2017 03:42 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कआळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने काँक्रिटीकरण करण्याची कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने अलंकापुरीत वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. अवघ्या सव्वा महिन्यावर आषाढी पायी वारी येऊन ठेपल्याने महिन्याच्या कालावधीत ही कामे पूर्णत्वास येतात की नाही, हाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून शहराला जोडणाऱ्या वडगाव, मरकळ, चाकण, केळगाव, भोसरी आदी रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यांचे नव्याने मजबुतीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिक सुमारे तीन वर्षांपासून प्रशासनाकडे करत होते. अखेर या वर्षी प्रशासनाने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे हाती घेऊन काँक्रिटीकरणास सुरुवात केली आहेत. त्यामुळे नागरिकांची तसेच भाविकांची अनेक वर्षांपासूनची रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा पूर्ण होत आहे. चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाकडून वडगावमार्गे चऱ्होली खुर्द हद्दीतून शहराला जोडणाऱ्या दीड किमी अंतराच्या दुहेरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तर चाकण बाजूकडून केळगावमार्गे सुरू असलेले काम गेल्या आठ दिवसांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. त्यातच मरकळ बाजूने शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेतल्याने मागील अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांना दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील बहुतांशी सर्वच रस्त्यांची खोदाई करून कामे संथ गतीने सुरू आहेत. परिणामी प्रवासादरम्यान वाहनांना अडथळा निर्माण होऊन विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.