शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

‘मिसिंग लिंक’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:56 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारी वाहतूककोंडी सोडविण्याकरिता खालापूर

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारी वाहतूककोंडी सोडविण्याकरिता खालापूर टोलनाका ते सिंहगड कॉलेज कुसगावदरम्यान होणाऱ्या मिसिंग लिंक या १३.३ मार्गाचा बोगदा व उड्डाणपूल मार्गाच्या कामाला पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केला आहे.द्रुतगती मार्गाची निर्मिती २००० साली झाली. मात्र आजही सेवा रस्ता, जोड रस्ते, ग्रामपंचायतीच्या कराचा विषय, पूर्वीचे भूसंपादन असे अनेक विषय प्रलंबित असल्याने नुकत्याच झालेल्या जनसुनावणीमध्ये कुसगाव ग्रामस्थांनी मिसिंग लिंकच्या कामाला विरोध केला आहे. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी देखील स्थानिकांचे रखडलेले विषय मार्गी लावल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विषय हाती घ्या, असे या जनसुनावणी करिता आलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पर्यावरण विभागाला सांगितले.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे काम करण्यात आले. त्या वेळी कुसगाव येथून खालापूर दरम्यान प्रस्तावित असलेला मार्ग अचानक बदलत वलवण गावाच्या बाजूने पांगोळी, तुंगार्ली मार्गे खंडाळा घाटातून वळविण्यात आला.यामुळे खंडाळा ते खालापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र आल्याने घाट परिसरात दैनंदिन वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी खालापूर टोलनाका ते कुसगाव सिंहगड कॉलेज दरम्यान १३.३ किमी अंतराचा मिसिंग लिंक हा आठ पदरी रस्ता बनविण्यात येणार आहे. यामध्ये ८.९ व १.६ किमी लांबीचे दोन बोगदे व ९०० व ६५० मीटरचे दोन व्हायाडक्ट असणार आहे. या प्रस्तावित मार्गात येणाºया वनजागेच्या बदल्यात वन विभागाला रायगड अथवा पुणे जिल्ह्यात बदली जागा देण्यात येणार आहे. तर ४० हजार नवीन वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कमीत कमी हवा व पाण्याचे प्रदूषण होईल याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले. मात्र स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केला आहे.तसेच काही अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांनी बोगद्यामध्ये निर्माण होणारी गरम हवा बाहेर काढण्याकरिता किंवा आगी सारखी काही घटना घडल्यास काय उपाययोजना केल्या आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले. जागा मालक शेतकºयांना कसल्याही पूर्व सूचना न देता जागेचा सर्व्हे करणे, खांब लावणे असे प्रकार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.लवकरच सर्व नागरिकांची कुसगाव गावात पुन्हा एकत्रित जनसुनावणी घेत स्थानिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्याबाबत निर्णय घेऊ, असे या वेळी अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान ‘मिसिंग लिंक’ ला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी रस्ते बांधणी करताना रखडलेले प्रश्न अगोदर मार्गी लावावेत त्यानंतरच नवीन काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.