शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अनियमित बांधकामे नियमित करा

By admin | Updated: March 9, 2016 00:34 IST

अनियमित बांधकामे नियमित होण्याबाबत आगामी अधिवेशनात नवा कायदा मंजूर करावा, अशी मागणी स्वराज अभियानचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर यांनी केली आहे.

पिंपरी : अनियमित बांधकामे नियमित होण्याबाबत आगामी अधिवेशनात नवा कायदा मंजूर करावा, अशी मागणी स्वराज अभियानचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेने बांधकामे नियमित करण्याची आश्वासने दिली. मात्र वर्ष उलटले, तरी हा प्रश्न ‘जैसे थे’ असल्याचेही म्हटले आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भापकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे सरकार या प्रश्नाबाबत निर्णय घेत नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरात सर्वपक्षीय आंदोलन झाले, त्या वेळी विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आणा. तुमचा हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. परंतु, सत्तेवर येऊन वर्ष उलटले, तरी प्रश्न ‘जैसे थे’ आहे. हा प्रश्न तत्काल निकाली काढून जनतेला दिलासा देणारा निर्णय होईल, अशी अपेक्षा असताना हा प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे. यामध्ये सन २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या मतांचे राजकारण दडले असल्याचे दिसते. भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शहरात अनियमित बांधकामांबाबत नोटिसा बजावणे, प्रत्यक्ष बांधकामांवर कारवाई करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, मिळकतधारकांना दुप्पट शास्तीकर आकारणे यांमुळे या शहरातील नागरिक हवालदिल झालेले आहेत. तरी सीताराम कुंटे समितीचा अहवाल, महसूल विभागाचा अहवाल व इतर सर्व तांत्रिक बाबींचा पाठपुरावा करून हे अहवाल उच्च न्यायालयासमोर ठेवावे, तसेच अनियमित बांधकामे नियमित होण्याबाबत नवा कायदा आगामी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तत्पूर्वी महापालिका सभेमध्ये उल्हासनगर महापालिका अधिनियम २००६, गुंठेवारी अधिनियम २००१, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ कलम १४३ व विकास आराखड्यातील आरक्षणाच्या जागेतील बाधित मिळकतधारकांची पर्यायी व्यवस्था, पुनर्वसन व्हावे, अशा आशयाचे प्रस्ताव या समितीसमोर आम्ही ठेवले, तसेच या शहरातील एम.आय.डी.सी. प्राधिकरण, पिं चिं. नवनगर प्राधिकरण व रेड झोन हद्दीतील बांधकामांबाबतीतील काही सूचना आम्ही समितीकडे केल्या होत्या. या समितीने ग्रामीण आणि शहरी भागातील बांधकामाबाबत एक धोरण तयार करावे, त्यानुसार अशा अनियमित बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत एक सर्वंकष, असा कायदा तयार व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु, याबाबत राजकीय हेतूने प्रेरित होऊन इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे काम रखडलेले आहे. (प्रतिनिधी)