शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सर्रास पेटविला जातोय कचरा, उपाययोजना करण्याबाबत महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:23 IST

प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असताना याबाबत महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत.

तळवडे - प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असताना याबाबत महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.आपले शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर हा नारा देत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाइल फोनवर ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हम ने’ अशा स्वरूपाच्या रिंगटोनही वाजू लागल्या आहेत.महापालिकेने शहर परिसरात ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. कचरा गोळा करणाºया घंटागाड्या कचरा गोळा करीत आहेत. परंतु तरीही बहुतांश ठिकाणी कच-याचे ढीग दिसत आहेत. कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. ओला व सुका असे कचºयाचे विलगीकरण, तर केवळ कागदावरच उरले आहे.कित्येक ठिकाणी साचलेला कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिक तो कचरा त्याच ठिकाणी पेटवून देत आहेत. यामुळे शहरात प्रदूषण वाढत आहे.कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद व सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर करायचे असेल व स्मार्ट सिटी करायची असेल, तर नागरिकांनी स्मार्ट व्हायला हवे. नाही तर चांगल्या योजनाही अपयशी होतात, याचा पिंपरी-चिंचवड शहरात वेळोवेळी प्रत्यय आला आहे.एमआयडीसी भागातही वाढले प्रकारशहर परिसरात कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरापाठोपाठ एमआयडीसीतही कचरा पेटविण्याचे प्रकार वाढले आहे. अनेक लहान-मोठ्या कंपन्यांच्या बाहेर कचरा पेटविल्याचे दिसून येते. यात कंपन्यांतील टाकाऊ वस्तू आदींचा समावेश असतो. यातून मोठ्या प्रमाणात धूर तयार होऊन प्रदूषणात वाढ होत आहे.कायदेशीर कारवाईची नागरिकांकडून मागणीकचरा पेटविण्याच्या प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासन आणि नागरिकांचीही उदासीनता दिसून येते. कचरा पेटविणाºयांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज४कचरा पेटविणारे संबंधित यंत्रणेच्या हाती लागत नाहीत. त्यांचा शोध घेणेही सहजशक्य नाही. त्यामुळे कचराकुंडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहेत. जेणेकरून कचरा पेटविणारे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होईल.कुंडीतच पेटविला जातो कचराशहरात अनेक ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. दाट वस्तीतील कुड्यांमध्ये कचरा टाकण्याचे मोठे प्रमाण असते. त्यामुळे बहुतांश कचराकुंड्या एका दिवसातच ओसंडून वाहत असतात. अशा कुंडीतच कचरा पेटवून देण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा बसणे आवश्यक आहे.कचरा विलगीकरणात येतात अडचणीकुंडीतील कच-याचे कचरावेचकांकडून विलगीकरण केले जाते. यातील प्लॅस्टिक आदी वस्तू वेगळ्या केल्या जातात. मात्र कुंडीतच कचरा पेटविल्याने कच-याचे विलगीकरण करणे शक्य होत नाही. कचरावेचकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कचºयासोबत प्लॅस्टिक पेटविल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड