शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

आज पडणारे प्रश्न उद्याचे संशोधन ठरेल

By admin | Updated: January 9, 2017 02:36 IST

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय

निगडी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय. नुसते पदवीधर होण्याने पुढे काही घडत नाही. वाचनामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. अनेक मोठी माणसे वाचनानेच घडली आहेत. जगात ग्रह, तारे, विमाने अशा कल्पना मांडल्या गेल्या. त्या दिशेने शोध लागत गेले, अशा गोष्टी वाचल्याशिवाय आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मनुष्याची प्रगती अशक्य आहे,असे प्रतिपादन ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.निगडीतील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या दिशा सोशल फाउंडेशनच्या साहित्यिक आपल्या दारी उपक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब भोसले, मानद सचिव बाबूराव जवळेकर, खजिनदार वसंत पवार, प्राचार्या शुभांगी इथापे, अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचेमाजी उपसभापती नाना शिवले उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने जगणे जितके महत्त्वाचे तितकेच जगण्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणेही महत्त्वाचे असते. मुलांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत. कारण जगात जिथे प्रश्न निर्माण होतात तिथेच नवीन काही घडत असते. प्रश्न विचारणे हे ज्ञानाच्या शोधार्थ निघण्याची पहिली खूण असते. याकरिता मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासाठी आणि विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आपला व्यासंग वाढविला पाहिजे. ’’शिवले यांनी प्रास्ताविक केले. संजय कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन महाजन यांनी आभार मानले. उपक्रमाचे संयोजन बाळू गावडे, किरण थोरात, रवींद्र खेडकर व दिशाचे संचालक गुरुदास भोंडवे, प्रवीण कुदळे, नंदकुमार कांबळे, रोहित खर्गे, किशोर जवळकर, संतोष चांदेरे, अविनाश ववले, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे यांनी केले. (वार्ताहर)