शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आज पडणारे प्रश्न उद्याचे संशोधन ठरेल

By admin | Updated: January 9, 2017 02:36 IST

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय

निगडी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय. नुसते पदवीधर होण्याने पुढे काही घडत नाही. वाचनामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. अनेक मोठी माणसे वाचनानेच घडली आहेत. जगात ग्रह, तारे, विमाने अशा कल्पना मांडल्या गेल्या. त्या दिशेने शोध लागत गेले, अशा गोष्टी वाचल्याशिवाय आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मनुष्याची प्रगती अशक्य आहे,असे प्रतिपादन ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.निगडीतील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या दिशा सोशल फाउंडेशनच्या साहित्यिक आपल्या दारी उपक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब भोसले, मानद सचिव बाबूराव जवळेकर, खजिनदार वसंत पवार, प्राचार्या शुभांगी इथापे, अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचेमाजी उपसभापती नाना शिवले उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने जगणे जितके महत्त्वाचे तितकेच जगण्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणेही महत्त्वाचे असते. मुलांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत. कारण जगात जिथे प्रश्न निर्माण होतात तिथेच नवीन काही घडत असते. प्रश्न विचारणे हे ज्ञानाच्या शोधार्थ निघण्याची पहिली खूण असते. याकरिता मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासाठी आणि विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आपला व्यासंग वाढविला पाहिजे. ’’शिवले यांनी प्रास्ताविक केले. संजय कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन महाजन यांनी आभार मानले. उपक्रमाचे संयोजन बाळू गावडे, किरण थोरात, रवींद्र खेडकर व दिशाचे संचालक गुरुदास भोंडवे, प्रवीण कुदळे, नंदकुमार कांबळे, रोहित खर्गे, किशोर जवळकर, संतोष चांदेरे, अविनाश ववले, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे यांनी केले. (वार्ताहर)