शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भूखंडांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक

By admin | Updated: April 23, 2015 06:32 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सध्या अनधिकृत आणि अतिक्रमण झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

मंगेश पांडे, पिंपरीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सध्या अनधिकृत आणि अतिक्रमण झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ताब्यात येणारे भूखंड शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परताव्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्यामुळे बांधकामे पाडून ताब्यात आलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नयेत, त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी अशा जागांना भिंत बांधून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांनी दिली. प्राधिकरणाची १४ मार्च १९७२ ला स्थापना झाली. यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आल्या. मात्र, प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींवर सीमाभिंत न बांधल्याने त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले. अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे साडेबारा टक्के परताव्यासाठीही प्राधिकरणाकडे जमिनी उरल्या नाही. शेतकऱ्यांना द्यावयाच्या परताव्यासाठी ७५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी प्राधिकरणाकडे विकसित केलेली ५० हेक्टर जमीन असून, आणखी २५ हेक्टर जमिनीची गरज आहे. दरम्यान, थेरगावात शुक्रवारी केलेल्या कारवाईत ताब्यात आलेली जमीन, तसेच इतर क्षेत्र मिळून आणखी दीड हेक्टर जमीन ताब्यात आली आहे.अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटवून ताब्यात आलेल्या जमिनींवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्राधिकरणाकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी ताब्यात घेतलेल्या भूखंडाच्या बाजूने सीमाभिंत बांधून त्या ठिकाणी प्राधिकरणाकडून फलक बसविण्यात येणार आहेत. यासह जमीन सुरक्षित राहण्यासाठी त्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याचे जावळे म्हणाले.