शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खड्डे, चर झाले मृत्यूचे सापळे

By admin | Updated: July 17, 2017 04:14 IST

बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्याची सध्या सुरु असलेल्या पावसामुळे व अर्धवट कामांमुळे दयनीय अवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबालेवाडी : बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्याची सध्या सुरु असलेल्या पावसामुळे व अर्धवट कामांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पदपथ उखडले गेले असून, त्यावर दगडमातीचे ढीग साचलेले आहेत. अनेक पदपथांवर दुकानदार, व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथावर जागा नाही. रस्त्याचे काम अर्धवट असून, रस्त्यात पडलेले चर आणि खड्डे मृत्यूचे सापळेच झाले आहेत.या रस्त्यावर रात्रंदिवस नागरिक, तरुण, विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते;रस्त्याच्या दुतर्फा असलेले दगडमातीचे ढिगारे उचलले गेलेले नाहीत. रस्ता आणि पदपथावर लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ना पदपथ, ना धड चालण्यासाठी रस्ता, अशी स्थिती आहे. रात्रीच्यावेळी अनेकदा स्ट्रीट लाईट बंद असतात. ठिकठिकाणी कंत्राटदारांच्या गाड्या आणि सामान ठेवण्यात आले आहे. नादुरुस्त, मोठे लोखंडी आणि सिमेंटचे पाईप, सळ्या, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आदींमुळे हा रस्ता डम्पिंग ग्राऊंडच झाला आहे. नागरिकांनी अनेक तक्रारी करूनसुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांमध्ये त्यामुळे प्रचंड चीड निर्माण झाली आहे.