शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

सीमाभिंत खचण्याची शक्यता

By admin | Updated: June 20, 2017 07:20 IST

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणाकरिता गेल्या अनेक वर्षांपासून बनकरवस्ती येथील रस्त्याच्या पश्चिमेस असलेली टेकडी पोखरली असून, यामुळे या टेकडीवरून जाणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणाकरिता गेल्या अनेक वर्षांपासून बनकरवस्ती येथील रस्त्याच्या पश्चिमेस असलेली टेकडी पोखरली असून, यामुळे या टेकडीवरून जाणाऱ्या संजय गांधीनगरच्या रस्त्याची सीमाभिंत खचण्याची भीती निर्माण झाली आहे. या टेकडीवर उभारलेल्या सिमेंट चौथऱ्याखालची माती खचली असून, ही भिंत थेट २० ते २५ फूट खाली असलेल्या महामार्गावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे संजय गांधीनगरच्या रहिवाशांचा मोशी गावठाणाकडे येण्याचा रस्ता बंद होणार असून, त्यांना बोऱ्हाडेवाडी रस्त्यावरून वळसा घालून गावठाणाकडे यावे लागणार आहे. त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होणार असून, नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार आहे.येथील बहुसंख्य विद्यार्थी मोशीतील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ते दररोज शाळेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. याबरोबरच नागरिकही कामानिमित्त दररोज मोशीत जाऊन-येऊन करीत असतात. रस्त्यावर रात्रीच्या वेळी रहदारीही मोठ्या संख्येने असते. रस्त्याच्या वरील बाजूस सावता माळी मंदिर असून, येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यामुळे या रस्त्यावरून भाविकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. हा रस्ता बंद झाल्यास गैरसोईचा सामना करावा लागणार आहे. भराव खचल्याने त्यावरील डांबरी रस्ताही कधीही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याच्या खालच्या व दक्षिणेकडे काही घरे आहेत. ही भिंत खचून डोंगराचा भराव वाहून आल्यास महामार्गासह या घरांवर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा विचार करून प्रशासनाने या भिंतीलगत समतल भिंत उभारून रस्त्याला कायमचा मजबूत आधार उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या भिंतीखाली काही घरे असून, ही भिंत कोसळल्यास जीवितहानी होऊ शकते. माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ही भिंत खचू नये याकरिता त्या भिंतीच्या पूर्वेला महामार्गाच्या बाजूने वीस ते पंचवीस फूट उंच सिमेंट भिंत उभारावी. यामुळे रस्ता खचण्याची भीतीही नाहीशी होईल व त्या खालच्या घरांवरील धोकाही टळेल, असे येथील रहिवाशांचे मत आहे. यावर तातडीने दखल घेतली जावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीचा महमार्गाच्या बाजूने भराव खचला असून, ती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, आजार झाल्याशिवाय उपचार न करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे कान कोण उपटणार? असा प्रश्न आहे. ही जबाबदारी नेमकी कोणाची, कोणता विभाग याला जबाबदार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या कोणालाही दुरुस्तीचे स्वप्न पडले नाही. अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी जनरेटा लावण्याची गरज आहे.याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी केली आहे. परंतु, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल परिसरातील नागरिकांतून विचारला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक होणारा पूल खचल्यास अनेक जणांचे प्राण जाण्याची शक्यता आहे. परंतु, आजार झाल्याशिवाय उपचार न करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे कान कोण उपटणार? असा प्रश्न आहे. ही जबाबदारी नेमकी कोणाची, कोणता विभाग याला जबाबदार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या कोणालाही दुरुस्तीचे स्वप्न पडले नाही. अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी जनरेटा लावण्याची गरज आहे.