शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

वीजतारांमुळे दुर्घटनेची शक्यता

By admin | Updated: October 5, 2015 01:42 IST

येथील विल्यमनगर, ओंकार कॉलनी, त्रिमूर्तीनगर, भाऊनगर, पंचरत्ननगर आदी परिसरात उच्च दाबाच्या वीज तारांमुळे स्पार्क होऊन आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बलभीम भोसले, पिंपळे गुरव येथील विल्यमनगर, ओंकार कॉलनी, त्रिमूर्तीनगर, भाऊनगर, पंचरत्ननगर आदी परिसरात उच्च दाबाच्या वीज तारांमुळे स्पार्क होऊन आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून भूमिगत केबलच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. परिसरातील बहुतांश ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी अनेक वर्षांपासून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून कामाच्या संदर्भात चर्चा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी महावितरणकडून या कामास मान्यता दिली आहे. मात्र या कामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. कंपनीकडून या कामात चालढकल क ेली जात आहे. केबलचे शॉर्टेज आहे. काम सुरू करणार आहे. या प्रकारची विविध कारणे सांगितली जात आहेत. ३० वर्षांपासून एकच वीजमीटर असून, एकाच मीटरवर संपूर्ण इमारतीचे कनेक्शन आहे. त्या इमारत मालकावर कारवाई केली जात नाही. याबाबत १ जून २०१५ रोजी वरिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. तीन मीटर खोदाई करून भूमिगत केबल टाकायची असताना कमी रुंदीची केबल टाकली जाते. कंत्राटदार व महावितरण यांच्या संगनमताने दीड मीटर खोदाई करून केबल टाकली जाते. नंतरच्या खोदकामामुळे केबल तुटते. त्यामुळे अनेक दिवस वीज बंद होण्याचे प्रकार घडतात. अधिकृत वीजमीटर घेण्यासाठी २५०० रुपये खर्च अपेक्षित असताना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एजंटद्वारे ग्राहकांकडून ८ ते १० हजार रुपये घेतले जातात. या एजंट लोकांना महावितरणकडून पाठबळ मिळत आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक

जर एखाद्या एजंटने वीज मीटरसाठी अधिक रक्कत घेतली असेल, तर त्याचे पुरावे द्यावेत. संबंधितावर लगेच कारवाई केली जाईल. या भूमिगत कामामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. दोन दिवसांच्या आत या कामास सुरुवात केली जाईल. बीव्हीजी कंपनीकडे गणेशोत्सव काळामध्ये मजूरवर्ग उपलब्ध नव्हता. या कामामध्ये लक्ष घालून दोन दिवसांच्या आत या कामास सुरुवात करणार आहे. - धनंजय औंढेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण वीजवाहक तारांच्या खाली पदपथ असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर भाजीविके्रते, वडापाव, पीठ गिरणी, किराणा आदीची दुकाने असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी ये-जा करतात. या वीजवाहक तारा रस्त्यावरील झाडांमध्ये अडकल्यामुळे संततधार पावसामध्ये झाडावर स्पार्किंग सुरूअसते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. - संदीपान बोऱ्हाडे, रहिवासी