शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

उधळपट्टीने पालिका गरीब

By admin | Updated: October 12, 2015 01:10 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका ३४ व्या वर्षात पदार्पण करीत असताना उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने एकेकाळी ‘श्रीमंत’ महापालिका अशी असलेली ओळख आता पुसू लागली आहे.

मंगेश पांडे, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिका ३४ व्या वर्षात पदार्पण करीत असताना उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने एकेकाळी ‘श्रीमंत’ महापालिका अशी असलेली ओळख आता पुसू लागली आहे. उधळपट्टी थांबवून काटकसरीचे धोरण अवलंबून जमा व खर्चाची तोंडमिळविणी करण्याचे आव्हान सत्ताधारी व प्रशासन यांच्यासमोर आहे. नियोजन न केल्यास याचे परिणाम येत्या दोन, तीन वर्षांत दिसू लागतील.नगरपालिका असताना जकातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविणारी नगरपालिका अशी आशिया खंडात पिंपरी-चिंचवडची ओळख होती. जकात उत्पन्नाच्या जोरावर अनेक प्रकल्प राबविले. मात्र, जकात बंद करून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला. महापालिकेने ‘एलबीटी’तूनही गेल्या वर्षी ११०० कोटींपर्यंत उत्पन्न मिळविले. मात्र, चार महिन्यांपूर्वी ‘एलबीटी’देखील बंद करण्यात आला. पन्नास कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांनाच एलबीटी आहे. त्यातच कारखान्यांचेही स्थलांतर होऊ लागले आहे. यामुळे महापालिकेपुढील अडचणी वाढल्या. मिळकतकराच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असताना त्यातही अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जात असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू असून, काही वर्षांतच सातवा आयोगदेखील लागू होईल. अशातच उत्पन्न मात्र कमी पडत आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून काही निधी मिळण्याची अपेक्षा असतानाच या योजनेतूनही वगळण्यात आल्याने अडचणी आणखीणच वाढल्या आहेत. सायन्स पार्क, दुमजली उड्डाणपूल यासह विविध रस्ते हे प्रकल्प गेल्या दोन वर्षांत पूर्णत्वास गेले असले, तरी घरकुल प्रकल्प, एम्पायर इस्टेट पूल, बंद जलवाहिनी, पाणीपुरवठा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात ४ मार्च १९७० ला नगरपालिका स्थापन झाली. त्यानंतर ११ आॅक्टोबर १९८२ रोजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ११ सप्टेंबर १९९७ ला नवीन १८ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. शहराचा विस्तार वाढल्याने लोकसंख्याही वाढू लागली.राज्य शासन, महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी एखाद्या कामाला वाढीव खर्च करताना अनेकदा विचार करायला हवा. पैशांची उधळपट्टी न करता काटकसरीचे धोरण अवलंबायला हवे. मात्र, महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणारी ‘स्थायी समिती’ दर आठवड्याला ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे घेत आहे. एकाच कामावर वाढीव खर्चाची खैरात केली जात आहे. अशीच उधळपट्टी सुरू राहिल्यास तिजोरी रिकामी होण्यास वेळ लागणार नाही.