शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा धाक नसल्याने आरोपी सैराट?

By admin | Updated: April 26, 2017 03:49 IST

मावळमध्ये दिवसेंदिवस खून, चोऱ्या, अवैध धंदे वाढत चालले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

वडगाव मावळ : मावळमध्ये दिवसेंदिवस खून, चोऱ्या, अवैध धंदे वाढत चालले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. वाढत चाललेली गुन्हेगारी चिंतेची बाब असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पोलीस मात्र काही घडतच नाही असा दिखावा करत आहेत़ गेल्या तीन दिवसांत तालुक्यात ५ खून झाले असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांना संशय येऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चोर असल्याच्या अफवा येत होत्या. त्यासाठी गावागावांत नागरिक रात्रभर गस्त घालत असत. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी घरावर दगड पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत नागरिकांनी पोलिसांनादेखील वेळोवेळी कळवले होते; परंतु या सर्व अफवा आहेत, यावर विश्वास ठेवू नका, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. परंतु, धामणे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर तालुक्यात चोर आहेत असा नागरिकांचा ठाम विश्वास झाला व चोर असल्याच्या अफवा सांगणाऱ्या पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे. तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस कोठेही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. तळेगावचे माजी नगराध्यक्षाचा भर दिवसा खून, तळेगावातील महाविद्यालयातील विद्यार्ध्याचा खून, लोणावळ्यातील युवक युवतीचा खून, सांगवडे येथील सरपंचाच्या पतीचा खून, या घटना ताज्या असताना धामणे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाच घरातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर काही वेळातच लोणावळा येथील कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या सर्व घडामोडीवरून हे स्पष्ट होतंय की तालुक्यात पोलिसांची कोणताही वचक राहिली नसून, गुन्हेगाराला पोलिसांची भीतीच राहिली नाही. मावळात खून, दरोडे अशा काही घटना घडल्या की पोलीस तालुक्यातील पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक बोलावतात आणि त्यांनाच मार्गदर्शन करतात. (वार्ताहर )