शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

स्वच्छतेत पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट’

By admin | Updated: February 16, 2016 01:22 IST

देशातील स्वच्छ शहरांत पिंपरी-चिंचवडचा शहराचा नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला आहे. महापालिकेने लोकांच्या सहभागातून राबविलेली स्वच्छता मोहीम

पिंपरी : देशातील स्वच्छ शहरांत पिंपरी-चिंचवडचा शहराचा नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला आहे. महापालिकेने लोकांच्या सहभागातून राबविलेली स्वच्छता मोहीम, हगणदारीमुक्त शहर, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेविषयी केलेले प्रयत्न यामुळे स्वच्छतेत इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर आघाडीवर आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्वर्गीय राजीव गांधी प्रशासकीय गतिमानताअभियान आणि बेस्ट सिटी अशा गौरवानंतर ‘स्वच्छ शहर’ या सन्मानाने उद्योगनगरीच्या लौकिकात भर पडली आहे.आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका, औद्योगिकनगरी असा विकासाचा आलेख स्तिमित करणारा आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास होत असल्याने बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे देश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी शहराचा गौरव केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या कालखंडात आयुक्त दिलीप बंड यांच्या कालखंडात महापालिकेला राज्याचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आयुक्त आशिष शर्मा आणि महापौर योगेश बहल यांच्या कालखंडात केंद्र सरकारकडून बेस्ट सिटी म्हणूनही शहराचा गौरव झाला होता. भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या कालखंडात गेल्याच वर्षी आयुक्त राजीव जाधव आणि महापौर शकुंतला धराडे यांच्या कालखंडात राजीव गांधी गतिमानता अभियानाचे पारितोषिक मिळाले होते. तसेच डॉ. श्रीकर परदेशी यांनी राबविलेल्या सारथी प्रणालीचाही गौरव झाला होता. त्यानंतर स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या वतीने केलेल्या पाहणीत पिंपरी-चिंचवड शहराचा देशात नववा क्रमांक लागला आहे.स्वच्छतेवर भर राजीव जाधव यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वच्छतेवर भर दिला आहे. ‘स्वच्छ शहरा’साठी पुढाकार घेतला. शहरातील विविध भागांत असणाऱ्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असते. आयुक्तांनी सुरुवातीला शहरातील मोकळे भूखंड स्वच्छ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वच्छता अभियानात लोकसहभागही घेतला. जागृती अभियान, लोकसहभाग शहरात पर्यावरणविषयक जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले. पर्यावरणजागृतीचे कार्यक्रम घेतले. तसेच विविध सामाजिक संस्थांना या अभियानात जोडले. कै. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान राबविले होते. त्याबरोबर शाळा स्वच्छतेचाही उपक्रम राबविला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११हजार स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाचेही विविध प्रयोग सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या टीमने मागील महिन्यात शहराची पाहणी केली होती. त्या वेळीही शहराच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात केंद्र शासनाच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. संपूर्ण देशातून ७५ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला एक हजार ५५९ गुण प्राप्त झाले. तीन भागांमध्ये गुण देण्यात आले. यामध्ये लोकवस्तीच्या ठिकाणची स्वच्छता, रस्तेस्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृह, रेल्वे स्थानक, गावठाण असलेला भाग, सुनियोजित निवासी वसाहत, कचरा जमा करण्याची पद्धती, कचरा वाहतूक व व्यवस्थापन यासाठी एक हजार गुण होते. तर टोल फ्री क्रमांकावर शहरातील नागरिकांकडून येणारा ‘फीड बॅक’ यासाठी पाचशे गुण होते. उर्वरित पाचशे गुण पथकाकडून करण्यात येणाऱ्या निरीक्षणातून देण्यात येणार होते. या सर्व प्रकारांतून पिंपरी-चिंचवडला दोन हजारांपैकी एक हजार ५५९ गुण प्राप्त झाले आहेत. नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी महापालिकेने शहरातील ठिकठिकाणी पथनाट्यांचे आयोजन केले होते. घरोघरचा कचरा गोळा करण्याची पद्धत व त्याचे नियोजन याकडे या अभियानांतर्गत अधिकाधिक लक्ष देण्यात आले होते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याची पद्धत चांगली असल्याने त्याचा चांगला फायदा गुण मिळण्यासाठी झाला. यासह शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेमुळेदेखील गुणांमध्ये भर पडली आहे. मात्र, ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे प्रमाण कमी असल्याने गुण कमी झाल्याचे बोलले जाते. ओला व सुका कचरा एकत्रितरीत्या जमा करतात.देशातील १० स्वच्छ शहरांमध्ये शहराचा समावेश झाला. यामुळे या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला खूप आनंद झाला आहे. बेस्ट सिटी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बक्षिसानंतर मिळालेला हा सन्मान होणे ही बाब आनंदाची आहे.- शकुंतला धराडे (महापौर)