शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

पिंपरी-चिंचवड हरित होणे गरजेचे

By admin | Updated: July 4, 2017 03:41 IST

देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट विचार घेऊन हरित शहराचा मूलमंत्र शहरातील लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे. वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. तीन दिवसांत राज्यात एक कोटी ६८ लाख वृक्षांची लागवड केली आहे, असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात पिंपरी, मिलिटरी डेअरी फार्म येथून झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, लेफ्टनंट कर्नल अविनाश शर्मा आदी उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, ‘‘पैशाने केवळ भौतिक सुख मिळते. मानवाला भौतिक सुखापेक्षा मनाच्या सुखाची गरज जास्त असून, वनराईतून मनाचे समाधान होते. शहराला वृक्षाची नावे दिली जातात. वनाचे संरक्षण होण्यासाठी ही नावे दिली जातात. शुद्ध हवा असेल, तर शुद्ध विचार आणि शुद्ध विचार असेल, तर शुद्ध आचारण होते. जगात प्रत्येक गोष्ट तयार करता येते. परंतु, प्राणवायू तयार करता येत नाही. प्राणवायूसाठी केवळ वडाचे झाड एकमेव यंत्र आहे. अनमोल प्राणवायू देणारे हे यंत्रच आपण तोडत आहोत. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हात हजारपट करणे हेच या वृक्षलागवड मिशनचे लक्ष्य आहे.’’‘वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी, अपंग नागरिक सहभागी झाले आहेत. लोकांच्या मनात वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण व्हावे, यासाठी हे मिशन आहे. वन विभागाच्या जमिनीवरील ८० टक्के वृक्ष जगले आहेत. इतर विभागांकडे वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दिली आहे. नकारात्मक भूमिकेपेक्षा वृक्ष वाचविण्याची संख्या वाढवायची आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.मुंबई-पुणे महामार्गावरील वृक्षतोडीबाबत पत्रकारांनी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘‘महामार्गाच्या कामासाठी वृक्ष तोडण्याची परवानगी दिली जाते. परंतु, ही परवानगी देताना वृक्ष लावण्याचे मिशनदेखील संबंधितांना दिले जाते. जिथे गरज आहे. तेथील वृक्ष तोडावे लागतात.’’ पिंपरीतील कार्यक्रमाची वेळ तीनची होती. कार्यक्रमस्थळी गर्दी जमावी या उद्देशाने एका शाळेचे विद्यार्थी दुपारी दोनपासूनच उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम दीड तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळावे लागले. चार कोटी वृक्ष लागवड करणारमुनगंटीवार म्हणाले, ‘‘पर्यावरण टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. परंतु, दुसरे कोण करेल असा विचार न करता मी करेल, असा विचार घेऊन काम करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला हरित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे. या वर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. तर पुढील वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य आहे. तसेच नागरिकांनी ग्रीन आर्मीचे सदस्य व्हावे. जिथे कुठे वृक्षाची अवैध तोड होत असेल, तर १९२६ या हॅलो फॉरेस्टवर कॉल करून पर्यावरणाचे सेनापती व्हावे.’’