शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:51 IST

पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणा-या पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच आहे. शिवाय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात पाच रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी यांचा समावेश आहे. या स्थानकांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. शहराचा विस्तार वाढत असून, लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यासह इतर ठिकाणी ये-जा करणाºयांमध्ये नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, प्रवास करण्यासाठी अनेकजणरेल्वेला प्राधान्य देत असल्यानेरेल्वे प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे अपुºया सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपूर्वी तीन लाख लोकसंख्येचा विचार करून रेल्वेस्थानकांवरपादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या लोकसंख्येत सात पटीने वाढ झाली असतानाही पुलांची रुंदी तितकीच आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्षपादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्या वेळी मोठी गर्दी होते. त्या वेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.पार्सल आॅफिसशेजारी दाटीवाटीपार्सल आॅफिस शेजारील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून खूप कमी प्रमाणात केला जातो. तिथे पार्सलचे सामान मोठ्या प्रमाणात पडलेले असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी सामानांची ने-आण करणारे टेम्पो व गाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे तेथून मोठ्या प्रवासी बॅगा घेऊन चालणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मुख्य पादचारी पुलाचाच जास्त वापर केला जातो.लोकलची संख्या अपुरीपुणे ते लोणावळा या ६६ किलोमीटर अंतरावर लोकल धावते. दिवसातून ४२ फेºया होत असून, यामध्ये सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या अपुरी पडत आहे.नव्या पुलाची मागणीसकाळी व सायंकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. यासह एक्सप्रेस आल्यानंतरही देखील फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. या वेळी जिन्यातून जात असताना प्रवाशांना अक्षरश: घाम फुटतो. त्यामुळे लोकलची संख्या वाढविण्यासह नव्याने पादचारी पुलांचीही उभारणी करणे आवश्यक बनले आहे.चिंचवड स्थानकावर भारशहरातील पाच स्थानकांपैकी चिंचवड रेल्वे स्थानक मोठे आहे. या ठिकाणी कोयना, भुसावळ, सिंहगड, इंदोर, नांदेड, ग्वाल्हेर या एक्सप्रेस थांबतात. त्यामुळे येथे रेल्वेतून चढ-उतार करणाºया प्रवाशांची संख्याही अधिक आहे.रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिन्यांची आवश्यकता आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्व ेस्थानकावरील जिन्यांची रुंदी कमी असून, पुलांची संख्याही अपुरी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.- गुलामअली भालदार,अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे