शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:51 IST

पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणा-या पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच आहे. शिवाय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात पाच रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी यांचा समावेश आहे. या स्थानकांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. शहराचा विस्तार वाढत असून, लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यासह इतर ठिकाणी ये-जा करणाºयांमध्ये नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, प्रवास करण्यासाठी अनेकजणरेल्वेला प्राधान्य देत असल्यानेरेल्वे प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे अपुºया सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपूर्वी तीन लाख लोकसंख्येचा विचार करून रेल्वेस्थानकांवरपादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या लोकसंख्येत सात पटीने वाढ झाली असतानाही पुलांची रुंदी तितकीच आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्षपादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्या वेळी मोठी गर्दी होते. त्या वेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.पार्सल आॅफिसशेजारी दाटीवाटीपार्सल आॅफिस शेजारील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून खूप कमी प्रमाणात केला जातो. तिथे पार्सलचे सामान मोठ्या प्रमाणात पडलेले असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी सामानांची ने-आण करणारे टेम्पो व गाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे तेथून मोठ्या प्रवासी बॅगा घेऊन चालणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मुख्य पादचारी पुलाचाच जास्त वापर केला जातो.लोकलची संख्या अपुरीपुणे ते लोणावळा या ६६ किलोमीटर अंतरावर लोकल धावते. दिवसातून ४२ फेºया होत असून, यामध्ये सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या अपुरी पडत आहे.नव्या पुलाची मागणीसकाळी व सायंकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. यासह एक्सप्रेस आल्यानंतरही देखील फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. या वेळी जिन्यातून जात असताना प्रवाशांना अक्षरश: घाम फुटतो. त्यामुळे लोकलची संख्या वाढविण्यासह नव्याने पादचारी पुलांचीही उभारणी करणे आवश्यक बनले आहे.चिंचवड स्थानकावर भारशहरातील पाच स्थानकांपैकी चिंचवड रेल्वे स्थानक मोठे आहे. या ठिकाणी कोयना, भुसावळ, सिंहगड, इंदोर, नांदेड, ग्वाल्हेर या एक्सप्रेस थांबतात. त्यामुळे येथे रेल्वेतून चढ-उतार करणाºया प्रवाशांची संख्याही अधिक आहे.रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिन्यांची आवश्यकता आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्व ेस्थानकावरील जिन्यांची रुंदी कमी असून, पुलांची संख्याही अपुरी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.- गुलामअली भालदार,अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे