शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:51 IST

पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणा-या पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच आहे. शिवाय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात पाच रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी यांचा समावेश आहे. या स्थानकांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. शहराचा विस्तार वाढत असून, लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यासह इतर ठिकाणी ये-जा करणाºयांमध्ये नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, प्रवास करण्यासाठी अनेकजणरेल्वेला प्राधान्य देत असल्यानेरेल्वे प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे अपुºया सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपूर्वी तीन लाख लोकसंख्येचा विचार करून रेल्वेस्थानकांवरपादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या लोकसंख्येत सात पटीने वाढ झाली असतानाही पुलांची रुंदी तितकीच आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्षपादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्या वेळी मोठी गर्दी होते. त्या वेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.पार्सल आॅफिसशेजारी दाटीवाटीपार्सल आॅफिस शेजारील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून खूप कमी प्रमाणात केला जातो. तिथे पार्सलचे सामान मोठ्या प्रमाणात पडलेले असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी सामानांची ने-आण करणारे टेम्पो व गाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे तेथून मोठ्या प्रवासी बॅगा घेऊन चालणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मुख्य पादचारी पुलाचाच जास्त वापर केला जातो.लोकलची संख्या अपुरीपुणे ते लोणावळा या ६६ किलोमीटर अंतरावर लोकल धावते. दिवसातून ४२ फेºया होत असून, यामध्ये सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या अपुरी पडत आहे.नव्या पुलाची मागणीसकाळी व सायंकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. यासह एक्सप्रेस आल्यानंतरही देखील फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. या वेळी जिन्यातून जात असताना प्रवाशांना अक्षरश: घाम फुटतो. त्यामुळे लोकलची संख्या वाढविण्यासह नव्याने पादचारी पुलांचीही उभारणी करणे आवश्यक बनले आहे.चिंचवड स्थानकावर भारशहरातील पाच स्थानकांपैकी चिंचवड रेल्वे स्थानक मोठे आहे. या ठिकाणी कोयना, भुसावळ, सिंहगड, इंदोर, नांदेड, ग्वाल्हेर या एक्सप्रेस थांबतात. त्यामुळे येथे रेल्वेतून चढ-उतार करणाºया प्रवाशांची संख्याही अधिक आहे.रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिन्यांची आवश्यकता आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्व ेस्थानकावरील जिन्यांची रुंदी कमी असून, पुलांची संख्याही अपुरी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.- गुलामअली भालदार,अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे