शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

विद्यार्थ्यांच्या विम्याचा महापालिकेला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:23 IST

तरतूद नसल्याने योजना बारगळली : मुलांच्या जिवाची प्रशासनाला नाही पर्वा

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. ही योजना फक्त एक वर्षापुरती राबवून त्यानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे.

महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा खासगी कंपनीमार्फत विमा काढण्यात आला होता. शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना तसेच इतरवेळेसही अपघात झाल्यास विद्यार्थ्याच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला होता.त्यामध्ये ३७ हजार ६६४ विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४० रुपये घेण्यात आले होते. त्यानुसार १५ लाख पंधरा हजार रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात आली होती. या शैक्षणिक वर्षामध्ये एकाच विद्यार्थ्याला या विम्याचा फायदा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही योजना लाभकारक होती. मात्र विमा योजना बंद केल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच महापालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा नाही का असा सवाल पालक करीत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरावा, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास, शस्त्रक्रिया करावी लागल्यास संबंधित कुटुंबास आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचा खर्च करणे शक्य होत नाही. त्या वेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविणे आवश्यक आहे. तरी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा. यासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करावी, असे पत्रात म्हटले आहे.अपघात झाल्यास पालकांना होतो भुर्दंडया विमा योजनेमुळे विद्यार्थ्याचा अपघात झाला तर त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी पालकांना आर्थिक हातभार मिळत होता. राज्य शासनाने पालकांना आर्थिक हातभार लागावा यासाठी २०१३ मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. मात्र यासाठी अनेक निकष असल्याने महापालिकेने काढलेल्या पॉलिसीला पालकांची पसंती मिळत होती. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. भविष्यामध्ये हेच विद्यार्थी आपल्या शहराचे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी काढण्यात येणाºया विमा पॉलिसी फक्त एक वर्षापुरत्या राबवून बंद केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व पालकांच्या आर्थिक हातभारासाठी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे का, असा सवाल पालक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड