शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

विद्यार्थ्यांच्या विम्याचा महापालिकेला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:23 IST

तरतूद नसल्याने योजना बारगळली : मुलांच्या जिवाची प्रशासनाला नाही पर्वा

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. ही योजना फक्त एक वर्षापुरती राबवून त्यानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे.

महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा खासगी कंपनीमार्फत विमा काढण्यात आला होता. शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना तसेच इतरवेळेसही अपघात झाल्यास विद्यार्थ्याच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला होता.त्यामध्ये ३७ हजार ६६४ विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४० रुपये घेण्यात आले होते. त्यानुसार १५ लाख पंधरा हजार रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात आली होती. या शैक्षणिक वर्षामध्ये एकाच विद्यार्थ्याला या विम्याचा फायदा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही योजना लाभकारक होती. मात्र विमा योजना बंद केल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच महापालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा नाही का असा सवाल पालक करीत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरावा, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास, शस्त्रक्रिया करावी लागल्यास संबंधित कुटुंबास आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचा खर्च करणे शक्य होत नाही. त्या वेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविणे आवश्यक आहे. तरी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा. यासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करावी, असे पत्रात म्हटले आहे.अपघात झाल्यास पालकांना होतो भुर्दंडया विमा योजनेमुळे विद्यार्थ्याचा अपघात झाला तर त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी पालकांना आर्थिक हातभार मिळत होता. राज्य शासनाने पालकांना आर्थिक हातभार लागावा यासाठी २०१३ मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. मात्र यासाठी अनेक निकष असल्याने महापालिकेने काढलेल्या पॉलिसीला पालकांची पसंती मिळत होती. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. भविष्यामध्ये हेच विद्यार्थी आपल्या शहराचे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी काढण्यात येणाºया विमा पॉलिसी फक्त एक वर्षापुरत्या राबवून बंद केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व पालकांच्या आर्थिक हातभारासाठी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे का, असा सवाल पालक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड