शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ऐन उन्हाळ्यात देहूकरांपुढे पेच

By admin | Updated: March 18, 2017 04:48 IST

येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद

देहूगाव : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद करण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या समस्येला ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे कळविले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देहूकरांच्या पुढे पुन्हा पेच निर्माण झाला आहे. देहूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. थकीत पाणीबिल असल्याने ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी, असे वारंवार प्राधिकरणाच्या वतीने २८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याबाबत कळविले होते. मात्र तुकाराम बीजोत्सव सोहळा यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, आमदार बाळा भेगडे यांनी मध्यस्थी करून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संतोषकुमार यांच्याशी संपर्क करून तुकाराम बीज सोहळा होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असा निर्णय घेतला होता. मात्र ६ मार्चच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही योजना आणखी तीन महिने जीवन प्राधिकरणाने चालवावी व वसुलीबाबत सक्त कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केली होती. तसा अहवालही सचिवांकडे पाठविला होता. मात्र, या निर्णयाला सचिवांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.(वार्ताहर)२० मार्चपासून पाणी बंदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी एन. एन. भोई यांनी ही योजना १९ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीने ताब्यात न घेतल्यास २० मार्चपासून पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे कळविले आहे.