शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ऐन उन्हाळ्यात देहूकरांपुढे पेच

By admin | Updated: March 18, 2017 04:48 IST

येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद

देहूगाव : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद करण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या समस्येला ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे कळविले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देहूकरांच्या पुढे पुन्हा पेच निर्माण झाला आहे. देहूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. थकीत पाणीबिल असल्याने ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी, असे वारंवार प्राधिकरणाच्या वतीने २८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याबाबत कळविले होते. मात्र तुकाराम बीजोत्सव सोहळा यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, आमदार बाळा भेगडे यांनी मध्यस्थी करून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संतोषकुमार यांच्याशी संपर्क करून तुकाराम बीज सोहळा होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असा निर्णय घेतला होता. मात्र ६ मार्चच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही योजना आणखी तीन महिने जीवन प्राधिकरणाने चालवावी व वसुलीबाबत सक्त कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केली होती. तसा अहवालही सचिवांकडे पाठविला होता. मात्र, या निर्णयाला सचिवांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.(वार्ताहर)२० मार्चपासून पाणी बंदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी एन. एन. भोई यांनी ही योजना १९ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीने ताब्यात न घेतल्यास २० मार्चपासून पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे कळविले आहे.