शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात देहूकरांपुढे पेच

By admin | Updated: March 18, 2017 04:48 IST

येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद

देहूगाव : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद करण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या समस्येला ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे कळविले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देहूकरांच्या पुढे पुन्हा पेच निर्माण झाला आहे. देहूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. थकीत पाणीबिल असल्याने ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी, असे वारंवार प्राधिकरणाच्या वतीने २८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याबाबत कळविले होते. मात्र तुकाराम बीजोत्सव सोहळा यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, आमदार बाळा भेगडे यांनी मध्यस्थी करून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संतोषकुमार यांच्याशी संपर्क करून तुकाराम बीज सोहळा होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असा निर्णय घेतला होता. मात्र ६ मार्चच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही योजना आणखी तीन महिने जीवन प्राधिकरणाने चालवावी व वसुलीबाबत सक्त कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केली होती. तसा अहवालही सचिवांकडे पाठविला होता. मात्र, या निर्णयाला सचिवांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.(वार्ताहर)२० मार्चपासून पाणी बंदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी एन. एन. भोई यांनी ही योजना १९ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीने ताब्यात न घेतल्यास २० मार्चपासून पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे कळविले आहे.