शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: October 12, 2016 01:58 IST

वाहनाच्या आतील काही दिसू नये, यासाठी शहरातील असंख्य वाहनांना काळ्या फिल्म लावल्या जात आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष

रावेत : वाहनाच्या आतील काही दिसू नये, यासाठी शहरातील असंख्य वाहनांना काळ्या फिल्म लावल्या जात आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अशा गाड्यांचा वापर करून काही समाजकंटक विघातक कृत्य करू शकतात. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. वाहनांच्या खिडक्यांवरील काचांवर फिल्मिंग करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरातील बहुतांश वाहनधारकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते, उद्योजक आणि शासकीय अधिकारी यांच्या गाड्यांनाही काळ्या फिल्म अद्याप कायम असल्याचे पाहावयास मिळते. नियमानुसार, उत्पादकाने बसविलेल्या काचांवर कुठल्याही प्रकारची फिल्म बसविणे कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा त्याची पर्वा न करता वाहनचालक फिल्म चिटकवितात. यामुळे वाहनाच्या आत कोण बसले आहे, हे बाहेरून दिसू शकत नाही. याचा उपयोग समाजविघातक कृत्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने अशा वाहनांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे . केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९मधील नियम १००(२) नुसार वाहनाच्या समोरील व मागील काचेची पारदर्शकता ७० टक्के पेक्षा अधिक, तर खिडक्यांच्या काचेची पारदर्शकता ५०टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. परंतु, असे असले तरी कंपनीतून वाहन बाहेर पडताच वाहनचालक गाडीच्या आतील भाग दिसू नये, यासाठी काळ्या रंगाच्या फिल्म चिकटवितात. अशा दोषी आढळलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ३ आॅगस्ट २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये चारचाकी वाहनांच्या काचांवरती कोणत्याही प्रकारच्या फिल्म लावण्यात येऊ नये, असा आदेश असताना अनेक चारचाकी वाहनांच्या काचावर गडद काळ्या रंगांच्या फिल्म बिनधास्तपणे लावल्या जातात. शहरामध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोरटे काळ्या काचांच्या गाड्यांचा वापर करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतु, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. शहरामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या गाड्यांना काळ्या काचा आहेत. या गाड्या पोलीस ठाण्याच्या समोर उभ्या केल्या जातात. परंतु, त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. काही पोलिसांच्या गाड्यांनाही काळ्या काचा आहेत. कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. अशा वाहनांवर पोलीस कारवाई करणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)