शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

दापोडीकरांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:57 IST

पंतप्रधान आवास योजना : महापालिकेने विश्वासात घेतले नसल्याचा नागरिकांचा आरोप

सांगवी : दापोडी येथील जयभीमनगरमधील झोपडपट्टीचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे पुनर्वसन करण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात दापोडीत निषेध सभा घेण्यात आली. पुनर्वसन प्रकल्पातून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे, असा आरोप करून जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेडगे-धायगुडे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेवक संजय काटे, शेखर काटे, देविदास साठे, रवी कांबळे, सुनीता अडसूळ, सिकंदर सूर्यवंशी, चंद्रकांत गायकवाड, अकिल शेख आदी या वेळी उपस्थित होते. विनय शिंदे, रवी कांबळे, अजय पाटील, अनिल गजभिव, शाहीद आत्तार, गुरुदत्त जाधव, अमित घाडगे व जयभीमनगर येथील नागरिकांनी सभेचे आयोजन केले होते.

वर्षानुवर्षे राहत असलेल्या व स्वत:च्या नावाने सातबारा व घरपट्टी भरत असलेल्या जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्पांतर्गत येथील नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचे सांगून या पुनर्वसन प्रकल्पास येथील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. शहर सुधारणा समिती बैठकीत स्थानिक नगरसेवकांना सामील न करता परस्पर निर्णय व विकासाचा घाट घातला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दापोडी गावठाण अस्तित्वात आले तेव्हापासून येथील नागरिक येथे वास्तव्य करीत आहेत. अनेक घरमालकांच्या एक ते चार गुंठ्यांपेक्षा जास्त जागा मालकी हक्क आहे. अनेक रहिवाशांची दुमजली घरे तर काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे आहेत. त्यांना शासनाकडून २६९ चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठी आर्थिक झळ पोहोचणार असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.नागरिकांच्या शंका व म्हणणे ऐकून घेण्यात येईल. त्यासंदर्भातील तांत्रिक व किचकट मुद्दे व निर्णय आयुक्त व त्या खात्यातील अधिकारी व नागरिकांची बैठक घेऊन सोडवले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येईल. खासगी जागा मालक व ज्यांचे सातबारा आहेत अशा रहिवाशांना शासकीय नियमाप्रमाणे परतावा देण्यात येईल.- सीमा चौगुले, नगरसेविका, अध्यक्षा, शहर सुधारणा समिती, महापालिका१९९८ साली असलेल्या २६९ चौरस फूट क्षेत्रातील घरांच्या चटईक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. किमान ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मिळत असेल व घरात दोन कुटुंब असतील तर प्रत्येक कुटुंबास स्वतंत्र सदनिका द्याव्यात, ही मागणी आहे. यापूर्वी अशाच प्रकारे चिंचवड लिंकरोडवरील झोपडीधारकांना अजूनही गेल्या बारा वर्षांपासून निवारा शेडमध्ये अडकून ठेवण्यात आले आहे. त्याची पुनरावृत्ती दापोडीत झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही.- चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेविका, दापोडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड