शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: July 17, 2017 04:08 IST

शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ अचानक खंडित झाल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील समस्या सुटत नसल्याचे अखेर रहिवाशांनी महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून समस्यांचा पाढा वाचला. वाकडमधील दत्तात्रय देशमुख (मॅक्झिमा सोसायटी), युवराज हुगे व बाळकृष्ण कलाटे (नंदन इन्स्पेरा सोसायटी) या रहिवाशांनी या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. वाकडच्या विविध सोसायट्यांतील २५० पेक्षा अधिक रहिवासी सहभागी झाले होते. बैठकीला महावितरणकडून सांगवी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. के सूर्यवंशी आणि सहायक अभियंता प्रकाश नाईकवाडे हे उपस्थित होते. वेदान्त, आयकॉन ग्रीन, गोल्ड फिंगर या खंडित वीजपुरवठ्याची झळ बसलेल्या सोसायट्यामध्ये तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या व्यतिरिक्त विद्युतपुरवठ्यातील समस्यांविषयी अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्युतपुरवठा वारंवार खंडित होणे, खंडित पुरवठा कमी दाबाने पुन:स्थापित झाल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक आदी मौल्यवान उपकरणांचे नुकसान होणे. लिफ्ट बंद पडणे, पाणीपुरवठा न होणे, मोबाइल चार्जिंग न होणे, गिझर, फ्रीज न चालणे अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले. याशिवाय परिसरात अनेक डीपीला झाकणे नाहीत, विजेची वाढीव बिले व त्याचे तत्काळ निराकरण होत नाही अशा समस्या नागरिकांनी मांडल्या. येथील वीजपुरवठा यंत्रणा खूप जुनी असल्याने तिची देखभाल आणि नियंत्रण अत्यंत जिकीरीचे झाले आहे. या ठिकाणी काम करताना महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रसंगी प्राण धोक्यात येण्याचीही शक्यता असते. येथील पुरवठा हिंजवडी आणि जगताप डेअरी येथील केवळ वाहिन्यावरून गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. या कालावधीत ग्राहकांचे संख्येत प्रचंड वाढ झाल्याने व्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन नेमक्या कोणत्या ठिकाणी आर्द्रता निर्माण झाली आहे हे शोधणे अवघड जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाला विलंब होतो असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. सलग दोन दिवस बत्ती गुल असल्याने रहिवाशांची घालमेल सुरु असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख आणि स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. महावितरणच्या सातत्याने अनेक चुका सुरूच असल्याने गैरसोय सुरु आहे. लवकर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.